महाराष्ट्र

नशिराबाद नगरपरिषदेच्या सदस्य संख्येबाबत २० ला निर्णय

नशिराबाद नगरपरिषदेच्या सदस्य संख्येबाबत २० ला निर्णय

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : येथून जवळच असलेल्या नवनिर्वाचित नशिराबाद नगरपरिषदेच्या सदस्य संख्येबाबत २० जुलैला जिल्हाधिकारी अभिजित राऊत निर्णय घेणार आहेत. याबाबत ते नगररचना विभागाला कळविणार आहेत. गेल्या १ जुलैला नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले. नंतर तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी प्रशासक म्हणून सूत्रे होती घेतली आहेत. (jalgaon-news-Nasirabad-Municipal-Council-Decision-on-number-of-members)

नगरपरिषद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा नवा आकृतिबंध तयार करावा लागेल. सध्या ग्रामंपचायतीत ६० कर्मचारी आहेत. आता नगरपरिषद झाल्यानंतर किती पदे तयार करावी लागतील, याबाबत अभ्यास सुरू आहे. सध्या नशिराबादची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २६ हजार आहे. २०२१ ची जनगणना झालेली नाही, अन्यथा या गावाची लोकसंख्या ३५ हजारांवर आहे. असे असल्याने सदस्य संख्या किती ठेवावी, याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. लोकसंख्येच्या आधारावर हे गणित असते.

शासनाकडून घ्यावी लागणार मंजूरी

नगरपरिषद झाल्यानंतर मुख्याधिकारी, इतर विविध विभागप्रमुख, लिपिक, शिपाई आदींची महत्त्वाच्या पदांचा आकृतिबंध तयार करावा लागेल. तो शासनाकडे पाठवून त्याला मंजुरी घ्यावी लागेल. सोबतच लोकप्रतिनिधी किती असावेत यावरही अहवाल तयार केला जाईल. येत्या २० जुलैला सदस्य संख्या ठरेल. प्रशासक नेमल्यानंतर गावातील पाणीपुरवठा, आरोग्य, पथदीप या बाबींवर लक्ष केंद्रीत असल्याचे प्रशासक तथा तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sprouts Usal Recipe: जेवणासाठी बनवा खास पौष्टिक मिक्स कडधान्यांची उसळ; सोपी रेसिपी लगेच करा ट्राय

Gulab Kulfi Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट गुलाब कुल्फी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: मातोश्रीवर उद्धव ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक

LPG Gas Cylinder : आता रांगेत उभे राहायची गरज नाही ; घरबसल्या ५ मिनिटांत करा एलपीजी कनेक्शन बंद, पैसेही परत मिळतील

Blood Pressure Walk: रोज फक्त १५ मिनिटं चाला, काही दिवसांत BP येईल नियंत्रणात; तज्ज्ञ काय सांगतात?

SCROLL FOR NEXT