death saam tv
महाराष्ट्र

Crime: पन्‍नास रूपयांच्‍या उधारीने गेला जीव

पन्‍नास रूपयांच्‍या उधारीने गेला जीव

साम टिव्ही ब्युरो

धरणगाव (जळगाव) : उधारीने दिलेले ५० रूपये घेण्याच्या वादातून पुतण्याने धक्का देत गटारात पडलेल्या काकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कंडारी येथे घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिस (Dharangaon Police) ठाण्यात पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news life was spent on borrowing in fifty rupees)

कंडारी येथील भारत सुकडू भिल (वय ४४) असे मयताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, की धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील कंडारी येथे राजू मानसिंग भिल (वय २८) आणि भारत सुकडू भिल (वय ४४) या दोघांमध्ये ५० रुपयांच्या उधारीवरून सोमवारी (ता. ७) रात्री शाब्दिक चकमक सुरू झाली. थोड्याच वेळात शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत (Crime News) झाले.

धक्‍का दिला अन्‌ गेला जीव

हाणामारीत राजूने काका भारत यांना जोराचा धक्का दिला. यात भरत भिल हे बाजूला असलेल्या गटारात जाऊन पडले. (Jalgaon News) गटारात पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठा रक्तस्राव झाला. यानंतर भेदरलेला पुतण्या राजूने त्यांना लागलीच नातेवाइकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती भारत भिल यांना मृत घोषित केले. यासंदर्भात पुतण्या राजू भिल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT