Child death
Child death 
महाराष्ट्र

पाणी आणण्यासाठी गेलेला बालक आलाच नाही; शेतात विजेच्या धक्क्याने मृत्यू

Rajesh Sonwane

कजगाव (जळगाव) : पाचोरा तालुक्यातील नेरी येथील एका बालकांचा विजेच्या धक्क्याने मुत्यू झाल्याची घटना आज (ता.५) दुपारी दोनच्‍या सुमारास घडली. (child who went to fetch water never came; Death by electric shock in the field)

नेरी (ता. पाचोरा) येथील शेतकरी गणेश पाटील यांच्या शेतात मजूर काम करीत असताना मजूरांना पाणी घेण्यासाठी मुलगा ओम गणेश पाटील (वय १०) जात असताना शेतात महापूरामुळे विद्युत तार पडलेली होती. या तारेला ओमचा स्पर्श झाल्याने त्‍याला विजेचा जोरदार झटका बसला. दरम्यान चाळीसगाव येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मुत्यू घोषित केले. ओम पाटील घरातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गावात नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत होती

महावितरणचा बेजबाबदारपणा कारणीभूत?

तीन– चार दिवसांपूर्वी परिसरात झालेला पाऊस आणि नदीला आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल जमिनीवर पडलेले आहेत. गणेश पाटील यांच्या शेतात देखील विद्युत तारा पडलेली होती. या तारेचा विद्युत पुरवठा सुरूच ठेवलेला होता. यामुळे ही घटना घडली असून महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे ओम पाटील याचा मुत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. याप्रकरणी चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT