हे सरकार पडेल अस वाटत नाही - राज ठाकरे
हे सरकार पडेल अस वाटत नाही - राज ठाकरे  Saam Tv
महाराष्ट्र

हे सरकार पडेल अस वाटत नाही - राज ठाकरे

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे या दौऱ्यातून महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले.

राज ठाकरे म्हणले की, हे तिघांचं सरकार पाहता हे सरकार पडेल अस वाटत नाही. राज्याची प्रकृती ठीक नाही, त्याला कारण राज्याला तीन डॉक्टर आहे. पेपरफुटी आणि ओबीसी आरक्षणावरून राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली.

हे देखील पहा -

मूळ विषय बाजूला ठेऊन, नको ते विषय पुढे येतात पत्रकारांचे पण यावर सुरच असत आर्यन खान 28 दिवस दाखवला बाहेर पडल्यावर काहीच नाही. मला कुणाचे व्यक्तिगत घोटाळे बाहेर काढायचे नाहीत, सोमय्या त्याचं काम करत आहे. आमच्या काळात जे काम झालं ते कधीही कुठंच झालं नाही, पाण्याचा जो प्रश्न आम्ही सोडवला तो या आधी कुणीच सोडवला नाही. लोक जो पर्यंत यांचा राग मतपेटीतून व्यक्त करणार नाही तो पर्यंत कुणीच सुधारणार नाही देखील राज ठाकरे यावेळी म्हणले.

पुढे म्हणले की, युती कुणासोबत करायची हे निवडणुकीच्या वेळी ठरूऊ. सचिन वाझे हे सहा महिने जेल मध्ये होते. त्या नंतर बडतर्फ असताना त्यांना शिवसेनेत प्रवेश मिळतो त्यांचे कार्याध्यक्ष जवळचे होते. मुकेश अंबानी ही कार्याध्यक्ष यांच्या जवळचे एक माणूस दुसऱ्या जवळच्या माणसाच्या घरासमोर स्फोटक लावून गाडी ठेवतो हे मला ही कळलं नाही.

एक लाख एसटी कर्मचारी आहेत अंगावर आले तर सरकार काय करणार. भ्रष्ट्राचार जर थांबला तर सगळं होईल बाबरी ज्या वेळी पडली त्याचा राग होता त्या वेळी मत मिळाली, अत्ता मंदिर बांधता आहे, त्याचे ही मत मिळतील का हे पाहावे लागेल असे देखील राज ठाकरे म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT