महाराष्ट्र

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2023: बाबासाहेबांचे पुतळे उभारून काही होणार नाही, संविधान वाचवण्याची गरज: राजरत्न आंबेडकर

Satish Kengar

Rajratna Ambedkar on Dr Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांचा केवळ राजकारणासाठी उपयोग केला जातोय. बाबासाहेबांचे पुतळे उभारून काही होणार नाही. संविधान वाचवण्याची गरज आहे, असं मत बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. सांगली जिल्ह्यातील जत येथे झालेल्या एका कार्यक्रमात ते असं म्हणाले आहेत.

आता सरकारनं इंदू मिलच्या जागी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभं करू नये. ती जागा समाजाच्या नावे करावी. सहा महिन्यात आम्ही स्मारक उभारू, असंही ते म्हणाले आहेत.

राजरत्न आंबेडकर म्हणाले आहेत की,''फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण करू नका, बाबासाहेबांचा एक विचार पूण करण्याचं काम आपल्या डोक्यामध्ये निर्माण करा. मग ते शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक असेल. हा विचार या जतमध्ये दिसला पाहिजे.'' (Latest Political News)

ते म्हणाले की, ''मला कधीकधी आश्चर्य वाटतं की, ज्या महामानवाने आपलं संपूर्ण आयुष्य जातीच्या अंताची लढाई करण्यासाठी घालवलं. जातीच्या व्यवस्थेच्या विरोधात बाबसाहेब उभे राहिले. जात नष्ट झाली पाहिजे यासाठी ते आयुष्यभर लढले. त्याच नेत्याला आपण जातीचा नेता करून ठेवलं आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT