Beed News Saam Tv
महाराष्ट्र

सगळं खापर केंद्र सरकारवर फोडायचं आणि स्वतः मात्र...भारती पवारांचा राज्य सरकारवर घणाघात

भाजपच्या लोकांवर राज्य सरकार सूडबुद्धीने काम करत आहे.

विनोद जिरे

बीड - सगळं खापर केंद्र सरकारवर फोडायचं आणि स्वतः मात्र काही करायचं नाही. अशी भूमिका महाराष्ट्रात राज्य सरकारची आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वात जास्त लस दिले. आर्थिक बजेट देखील दिले. त्याच श्रेय मात्र घेतलं जातं परंतू सांगत असताना लोकांमध्ये भ्रम निर्माण केलं जात आहे, हे दुर्दैव आहे. अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांनी केली आहे. त्या बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता बोलत होत्या.

हे देखील पहा -

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भाजपच्या लोकांवर राज्य सरकार सूडबुद्धीने काम करत आहे. नारायण राणे असतील आणि इतर लोकांना त्रास देणे सुरू आहे. निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात. आम्ही कुठल्याही यशाने हुरळून जात नाहीत आणि अपयशाने खचून जात नाहीत. अशी आमची भारतीय जनता पार्टी आहे. देशसेवेसाठी जे जे करता येईल ते केंद्र सरकार काम करत आहे. राज्य सरकारने काय काय केलं हे आपण पाहतच आहात. शेतकरी प्रश्नावर राज्य सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे असे देखील त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उरण ONGC प्रकल्पाला भीषण आग

WhatsApp Down: व्हॉट्सअॅप अचानक डाऊन, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

IRCTC Jyotirlinga Yatra: बम बम भोले! भारतीय रेल्वेची ज्योतिर्लिंग यात्रा, कसं कराल तिकीटाचं बुकिंग, जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

Shirpur : सुरुंग फुटून अंगावर पडला दगड; शिरपूर तालुक्यातील जवानाला लद्दाख येथे वीरमरण

Gardening Tips : या सोप्या टिप्स वापरून घरीच उगवा हिरवीगार पालक

SCROLL FOR NEXT