अमरावती: प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शिवसेनेतील फूट आणि गुवाहाटी दौऱ्याविषयी नवा गौप्यस्फोट केलाय.राज्यात शिवसेना- भाजप यांचे सरकार होऊन साधरण २ वर्ष होत आहेत. तरी अजूनही याप्रकरणात नवं-नवीन खुलासे होत आहेत. नुकताच बच्चू कडू यांनी केलेल्या नव्या गौप्यस्फोटामुळे राजकारणात खळबळ माजण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या प्रचारात भाजप आणि शिवसेना आणि भाजपच्या युतीसंदर्भात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा मुद्दाही अनेक सभांमध्ये गाजला. आता प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटी दौऱ्यावर नवा खुलासा केलाय. गुवाहाटीला जाण्याआधी आणि एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याआधी आपण उद्धव ठाकरेंना फोन केला होता, परंतु ते काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते, असं कडू यावेळी म्हणालेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.