अविनाश कानडजे
औरंगाबाद : औरंगाबाद मध्ये विद्युत पारेषणच्या भोंगळ कारभारमुळे नागरिकांच्या जिवाला धोका धोका निर्माण झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी ते जैतखेडा रस्त्यावर विद्युत पारेषण वाहिनीच्या तारा खाली तुटुन लोंबकळल्याने या रस्त्यावरील वाहतूक आज सकाळी आठवाजेपासून ठप्प आहे.
बाजारसावंगी ते जैतखेडा या रस्त्यावरुन किमान 20-22 खेड्यातील नागरिक ये-जा करतात. तसेच, या रस्त्याजवळ नागरी वस्त्या आहे. या रस्त्यावरील शेखपूरवाडी फाट्या अगोदर विद्युत पारेषणची विद्युत वाहिनी गेली आहे.
या विद्युत वाहिनीवरील एका बाजुच्या दोन विद्युत तारा चिनीमातीच्या चिमण्यातुन तुटून जमिनी लगत लोंबकळल्या. तसेच, जवळ असलेल्या वस्तीवर वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत खांबावर या तारा कोसळल्याने 4 विद्युत खांब विद्युत तारेसह भुईसपाट झाले. या विभागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला.
विशेष म्हणजे या भागातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे या भागातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. याच भागातील विद्युत वाहिनी वेळोवेळी तुटत असल्यामुळे या भागातील रस्त्यावरील प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. उशिरापर्यंत या विद्युत पारेषण विभागाचे कर्मचारी दुरूस्तीसाठी आले नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.