वाहुन गेलेल्या पुलाने घेतला आणखी एक बळी; बीडमधील धक्कादायक घटना विनोद जिरे
महाराष्ट्र

वाहुन गेलेल्या पुलाने घेतला आणखी एक बळी; बीडमधील धक्कादायक घटना

निगरगट्ट लोकप्रतिनिधी व प्रशासन आणखी किती बळी घेणार ?

विनोद जिरे

बीड - भोजगाव Bhojgaon येथील अमृता नदीवरील Amruta River वाहुन गेलेल्या पुलाने आणखी एक बळी घेतला आहे. पुलावरून सावडण्याच्या कार्यक्रमाला जात असताना पाण्यात पडुन सुदर्शन संत या तरुणाचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू Death झाला आहे. तर ज्या मयत मुलीच्या सवडण्याच्या कार्यक्रमाला तो जात होता. त्या मयत मुलीचा मृतदेह देखील दोन दिवसांपूर्वी वडिलांना आपल्या खांद्यावर घेऊन जावा लागला होता.

हे देखील पहा -

तर या नेहमी होणाऱ्या दुर्घटनेमुळं ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर मृतदेह ठेवून रस्ता रोको करत लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध केला.गेल्या काही वर्षांपासून भोजगावला जोडणारा अमृता नदीवरील पुल वाहून गेला आहे. याआधी देखील वाहुन जाण्याच्या घटना घडलेल्या असुन आज परत ही घटना घडली आहे.

त्यामुळे निगरगट्ट लोकप्रतिनिधी व प्रशासन आणखी किती बळी घेणार ? असा संतप्त सवाल भोजगाव ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दरम्यान नागरिकांनी मृतदेह गेवराई - शेगाव राज्य महामार्गावर ठेवून महामार्ग बंद केलेला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT