अमरावती: संचारबंदीतून दिलासा; बाजारपेठ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु
अमरावती: संचारबंदीतून दिलासा; बाजारपेठ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु  अरुण जोशी
महाराष्ट्र

अमरावती: संचारबंदीतून दिलासा; बाजारपेठ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु

अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती: अमरावतीकरांना Amravati आजपासून संचारबंदीतून मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती शहरातील परिस्थिती पाहता सकाळी ७ वाजतापासून तर रात्री ९ पर्यंत शहरातील बाजारपेठ सुरू राहणार असून रात्री ९ वाजतापासून तर सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी राहणार आहे. जवळपास १५ तास शहरातील बाजारपेठ सुरू राहणार आहे. शहरात घडलेल्या हिंसात्मक घटनेवर पोलिसांनी नियंत्रण मिळविल्यानंतर शहरातील संचारबंदीत टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. मंगळवारपासून संचारबंदीत मोठ्या शिथिलता देण्यात आहे. सकाळी ७ वाजतापासून तर रात्री ९ वाजतापर्यंत शहरातील सर्व बाजारपेठ सुरू राहणार आहेत.

हे देखील पहा-

तर, रात्री 9 वाजतापासून तर सकाळी ७ वाजतापर्यंत शहरात कडक संचारबंदी राहणार आहे, संबंधित आदेश पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी निर्गमित केले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ व भाजीपाला मार्केट तसेच सक्करसाथ, इतवारा यांना दिलेली सूट ही कायम राहणार आहे.

दरम्यान, अमरातवीत बंदला हिंसक Amravati Violence वळण लागून हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अमरावतीमध्ये संचारबंदचे आदेश देण्यात आले होते. भाजपान केलेल्या बंदच्या आवाहनला हिंसक वळण लागलं होतं. आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली होती. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे आज होणाऱ्या भाजप आणि वंचितच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जमाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Dye Colors : टक्कल होण्याआधी डायला करा बाय बाय; घरच्याघरी सोप्या पद्धतीने केस करा काळेभोर

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला

Maharashtra Lok Sabha 2024: राज्यात महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार? विजय वडेट्टीवारांनी थेट आकडाच सांगितला

Hingoli News : वाळू माफियांची दादागिरी; मध्यरात्री तलाठ्यांच्या घरावर हल्ला, दरवाजा न तुटल्याने दोन तलठ्यांचे प्राण वाचले

Vishal Patil: सांगलीत वाऱ्याचं वादळ झालंय; माझा विजय निश्चित... विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास; संजय राऊतांना फटकारले

SCROLL FOR NEXT