पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या परप्रांतीय सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाची तक्रार दडपण्यासाठी धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी शिक्षक अद्याप फरार आहे.
आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यात भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता.. तर दोघेजण गंभीर जखमी झाले होते. अनुक्रमे 13 आणि 14 वर्षाच्या दोन जखमीं मुलाना गडचिरोलीत काही उपचार केल्यानंतर हेलिकॉप्टर द्वारे नागपुरात आणण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई केली जाईल असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलय. मुंबई गोवा महामार्गाची पाहणी साठी त्यांचा आजपासून कोकण दौरा आहे. रायगडमधील रस्त्याची पाहणी केल्यानंतर ते रत्नागिरीत दाखल झाले आज कशेडी बोगद्याची त्यांनी पाहणी केली.कशेडी ते रत्नागिरी या टप्प्याची त्यांनी पाहणी केली. कशेडी बोगदा येथे त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
स्वस्तिश्री जिनसेन पट्टरक भट्टारक महास्वामी यांची मनोज जरांगे यांनी घेतली भेट
महादेवी हत्तींनी संदर्भात आणि सध्या सुरू असलेल्या लढ्या संदर्भात केली चर्चा
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी.
तब्बल तीन आठवड्याने आलेल्या पावसाच्या सरींमुळे शेतकरी सुखावला.
जिल्ह्यातील संग्रामपूर शेगाव जळगाव जामोद परिसरात जोरदार पावसाचे आगमन.
पुणे -
वडील रागावल्यामुळे मुलाने आत्महत्या केली
पुण्याच्या राजगड तालुक्यातील विंझर धनगरवस्तीतील घटना
गणेश गोसू चव्हाण असं या 16 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव
दोन मित्र माहूली गडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात फिरण्यासाठी आले होते मात्र फिरत असताना ते रस्ता चुकले व जंगलात भरकटले आहे. यांची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली पोलिसांनी जीवरक्षक टिमच्या सदस्यांना यांची माहिती दिली माहीती मिळता जीवरक्षक टिमचे 8 सदस्य सदस्य पोलिसां सोबत माहूली गडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात शोधण्यासाठी रवाना झाले आहे ही मुले ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणखीन दिड तास लागल्याचा अंदाज केला जात आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली नांदणी जैन मठाला भेट
स्वस्तिश्री जिनसेन पट्टरक भट्टारक महास्वामी यांची मनोज जरांगे यांनी घेतली भेट
महादेवी हत्तींनी संदर्भात आणि सध्या सुरू असलेल्या लढ्या संदर्भात केली चर्चा
पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात गुरुवारी दुपारी आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दोन सहाध्यायांनी चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे पालक वर्गामध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी...
सोशल मीडियावर रिल्स तयार करून नवनीत राणा यांना गळा कापण्याची आणि जीवाने मारण्याची धमकी....
यापूर्वीही अनेकवेळा नवनीत राणा यांना आले आहे जीवे मारण्याच्या धमक्या..
सध्या अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांच्याकडून तक्रार दाखल करणे सुरू
यवतमाळ जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट चा इशारा दिला होता. गेल्या वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा चांगलाच संकटात सापडला होता.त्यातच कडक उन्हामुळे शेतातील पिके मानाखाली टाकत असल्याने शेतकरीवर्ग चिंतेत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह दहा मिनिट रिमझिम पाऊस बरसला त्यामुळे शेतपिकांना काही वेळेसाठी जीवनदान मिळालाय.
एका मनोरुग्णाला शेतातील टिन शेडच्या झोपडी मध्ये ठेवलं बांधून ठेवण्याचा प्रकार उघड.
मनोरुग्ण गावकऱ्यांना त्रास देत असल्याने आईनेच आपल्या मनोरुग्ण मुलाला शेतात ठेवले बांधून.
दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून आई या मनोरुग्ण मुलाला देते जेवण.
गरीब परिस्थितीमुळे मनोरुग्ण मुलावर उपचार करणे शक्य नसल्याने आई हतबल.
सांगली जिल्ह्यातील ड्रग्ज विषयी खूप काही गोष्टी आता कंट्रोलमध्ये आले आहे. यापुढे जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत गाव पातळीवरील तंटामुक्त समिती या प्रभावी करणे हा उद्देश असल्याचं सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी मधील उद्योजकांच्या सोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये बैठक पार पडली,या बैठकीमध्ये उद्योजकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करण्याचा आश्वासन ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
० किल्ले रायगडच्या पायरी मार्गावरील संरक्षण भिंत कोसळली
० रायगड किल्ल्यावरील महादरवाजाखाली काही अंतरावर होती हि संरक्षण भिंत
० नव्याने बांधण्यात आली होती संरक्षण भिंत
० किल्ले रायगडावर शिवकालीन पद्धतीने होणाऱ्या बांधकामावर निकृष्ठ दर्जाचे आरोप होत असताना संरक्षण भिंत कोसळल्याची घटना
ऋषभ पंत आशिया कपमधून बाहेर
ही टेस्ट सीरिज पण नाही खेळणार
ऋषभ पंतच्या पायाचा अंगठा फॅक्चर झाला
कोर्टाने दादरमधील कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम ठेवली आहे. कोर्टाच्या निर्णयाने आंदोलकांना मोठा झटका बसला आहे.
महादेवी हत्तीणीसाठी सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल
सीआर जया सुकीन यांनी दाखल केली याचिका
महादेवी हत्तीणीला परत नांदणीत आणण्यात यावे यासाठी मागणी केली जात आहे
धाराशिव -
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरेंना दिसत नाही त्यांना चष्म्याचा नंबर बदलावा लागेल किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागेल
नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टिका
मोदींनी योगा दिवस दिला संपूर्ण देशाने स्वीकारला
मोदींनी दहशतवादाच्या विरोधात लढाई उभारली देश उभा राहिला, दहशतवादाविरोधात जग उभ राहिल
भंडारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
आठवडाभराचा विश्रांतीनंतर अखेर पावसाने लावली दमदार हजेरी
या पावसाच्या सर्वात जास्त फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार
उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याने चारधाम यात्रेसाठी गेलेले अनेक पर्यटक अडकले असून त्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश आहे
मुलुंड मधील 62 जणांचा ग्रुप देखील अडकला असून यातील साठ वर्षीय कांचन गोहिल यांच्या कुटुंबातील प्रतीक गोहिल यांनी याबाबत माहिती दिली आहे
31 जुलै ला निघालेला हा ग्रुप दरड कोसळल्यानंतर उत्तराखंड मधील गंगोत्री येथील एका हनुमान आश्रम मध्ये अडकून असल्याचा शेवटचा फोन त्यांना आला होता
या सर्वांना लवकरात लवकर रेस्क्यू केले जावं आणि त्यांना महाराष्ट्रात आणलं जावं अशी मागणी प्रतीक गोहिल यांनी प्रशासनाकडे केली आहे
पुण्यात वैभवशाली आणि ऐतिहासिक गणेशोत्सवाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. पुणे शहरातील श्री गुरुदत्त तरुण मंडळाकडून यंदा थ्री डी (3D) लेसर स्कॅनिंगचा वापर करून मूर्ती बनवण्यात आली आहे. मूळ मूर्तीचे थ्री डी स्कॅनिंग करून हुबेहुब बायोडिग्रेडेबल प्लास्टिक ची मूर्ती बनवण्याचा पहिलाच प्रयोग पुणे शहरात राबवण्यात आला. पुण्यातील इंद्रजीत जोशी यांनी त्यांच्याजवळ असलेल्या या एकमेव वायरलेस थ्री डी स्कॅनर ने संपूर्ण मूर्तीचे स्कॅन करण्यात आले. या मशीन ने मूळ मूर्तीवर असलेली अगदी बारीक बारीक नक्षीकाम सुद्धा टिपलं आणि त्यानंतर लेसर प्रिंटिंगच्या सहायाने दुसरी मूर्ती तयार केली.
दिल्लीत जरी महाविकास आघाडीची बैठक झाली असली तरी शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत असा मोठा आरोप करत भाजपला सोडून ते कधीही बाहेर पडू शकत नाहीत. पंधरा दिवस थांबा देशाच्या राजकारणातील एक नवीन बातमी समजेल. असा खळबळजनक दावा ही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
माधवी ( हत्ती ) मागे येणार ती लोकांच्या भावनेशी जोडलेली आहे. आम्ही सर्व राज्यातील मराठा समाज त्यांच्या मागे उभा राहणार. त्यामुळे माधवी परत येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमाचे बोलत होते.
त्याचबरोबर मी सायंकाळी त्या ठिकाणी जाणार आहे. आणि तेथील परिस्थिती जाणून घेणार आहे आणि लोक भावनेचा आदर करत सर्व मराठा समाज महादेवीच्या मागे उभा राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
४ दिवसाच्या विश्रांती नंतर पुण्यात पावसाला सुरवात
शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी
अचानक आलेल्या पावसामुळे मात्र पुणेकरांची दाणादाण
- काही एजेंट, CSC सेंटर, ई सेवा केंद्र चालकांकडून फसवणूक
- बिगर मराठा उमेदवारांच्या कागदपत्रात छेडछाड करून त्यांना महामंडळाकडून लाभ मिळवून दिल्याचं देखील उघड
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची माहिती
- काही एजंट, CSC सेंटर, ई सेवा केंद्र चालकांकडून सरकारची फसवणूक
- नाशिक आणि नगर जिल्ह्यात ८ ते १० केसेस शोधून काढल्या
दौंड तालुक्यातील यवत गावात हिंसाचारामुळे लावण्यात आलेली जमावबंदी पुणे जिल्हाधिकारी यांनी पूर्णपणे उठवली आहे.दिनांक 5 ऑगस्ट पासून जमावबंदी मध्ये शिथिलता आणली होती.सकाळी 6 ते सकाळी 11 पर्यंत बाजारपेठा चालू ठेवल्यास मान्यता देण्यात आली होती.मात्र आता यवत पूर्ण शांतता असल्याने आणि सर्व जनजीवन सुरळीत असल्याने पुणे जिल्हाधिकारी यांनी आज पासून सर्व जमावबंदी आदेश मागे घेतला आहे त्यामुळे यवत मध्ये सर्व जीवन पूर्वी प्रमाणे सुरळीत झाले आहे.
महापालिकेमध्ये बुधवारी मनसे नेते किशोर शिंदे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. बैठक सुरू असताना अचानकपणे निवेदन देण्यासाठी गेलेल्या किशोर शिंदे आणि आयुक्तांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाची मध्ये किशोर शिंदे थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याचे सांगितलं जात आहे तसेच आयुक्तांनी देखील तुमचं वर्तन गुंडांप्रमाणे असल्याचं किशोर शिंदेंना सुनावले. त्यानंतर किशोर शिंदे यांनी आयुक्तांना मराठीत बोला असे सांगितल्याने या वादाला हिंदी मराठी वादाची किनार देखील लाभली.
पशुपालक,शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृती समिती कडून काढण्यात येत आहे मोर्चा
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकपासून झालीय मोर्चाला सुरुवात
या मोर्चामध्ये भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा,निळा, भगवा आणि पिवळे झेंडे आले आहेत फडकवण्यात
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते पूनम गेट असा असणारे आहे मोर्चाचा मार्ग
या मोर्चामध्ये सोलापूर शहर आणि जिल्हाभरातून 10 ते 15 हजार लोकांचा आहे सहभाग
या मोर्चासाठी सोलापूर पोलिसांचा आहे कडक बंदोबस्त
2007 मध्ये विजय पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती
राष्ट्रवादीचे नेते वंडार पाटील यांचे पुत्र होते विजय पाटील
गुन्ह्यात एकूण 13 आरोप असून शिंदे गटाचे महेश पाटील सह 10जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता, केली होती
तर तीन आरोपी दोषी ठरले: विजय बाबुराव वाकडे, साजिद हमीद शेख, सुनील रामचंद्र भोईर
कल्याण न्यायालयाचा निकाल तिघांना जन्मठेपेची शिक्षा
कोल्हापूरकरांविषयी आक्षेपार्य विधान करणाऱ्या हिंदुस्तानी भाऊला कोल्हापुरी चपलेचा प्रसाद
कोल्हापूरकरांना अपशब्द वापरणाऱ्या हिंदुस्तानी भाऊला दिसेल तिथे कोल्हापुरी चपलाने ठोका... कोल्हापूरकरांचा आव्हान
हिंदुस्तानी भाऊच्या पोस्टरला दिला कोल्हापुरी चपलांचा प्रसाद
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या अनेक शासकीय इमारतींचे उद्घाटन
पुणे पोलिस मुख्यालयात कमांड अँड कंट्रोल सेंटर चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार
पुणे पोलिसांच्या ताफ्यातील नवीन मोबाईल सर्व्हेलन्स वेहिकल चे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार सुद्धा राहणार उपस्थितीत
मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या यशदा येथे शासकीय अधिकाऱ्यांची बैठकीची शक्यता
अडकलेल्या पर्यटकांपैकी अशोक टेमकर यांनी दुसऱ्याच्या नंबर वरून फोन करून दिली आहे. अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयातील १९९० ची दहावीची बँच पर्यटनासाठी उत्तराखंड येथे गेली होती. गंगोत्री येथे असताना ढगफुटीची घटना घडल्याने परवापासुन या सर्वांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे सर्वांचेच नातेवाईक चिंतेत होते. आता मात्र या अडकलेल्या पर्यटकांचा संपर्क झाला असुन लवकर सर्व पर्यटकांना सुखरूप आणले जाणार असल्याने नातेवाईकांची चिंता कमी झाली आहे.
महादेवी हत्तींनी संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीतला व्हिडिओ समोर
राजू शेट्टी यांनी महादेवी हत्तीनी संदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याने विहान करनी यांनी राजू शेट्टी यांची काढली समजूत
विहान करनी यांनी बैठकीत राजू शेट्टी यांना हस्तांदोलन करत त्यांच्या हाताच घेतलं चुंबन
मंत्र्यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा जाहीर होताच ठेकेदारांचा रस्ता सुस्थितीत असल्याचा केला जातोय फार्स
महामार्गाची मंत्री पाहणी करणार म्हणून ठेकेदारांची लगबग
पॅचवर्क आणि खड्डे भरण्याचं काम सुरू
महामार्गाच्या रखडलेल्या पट्ट्यातील डायवर्शन सुद्धा काढण्याचे काम
कांटे ते निवळी असा रखडलेला मुंबई गोवा महामार्गावरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा
सकाळपासून ठीक ठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्याचा देखील काम सुरू
- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर
- बार्शी तालुक्यातील चांदणी नदीत बुडून सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यु
- समर्थ संतोष शिरसाट असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव
- कांदलगाव परिसरात असणाऱ्या चांदणी नदीजवळ खेळायला गेल्यावर रात्रीच्या सुमारास घडली घटना
परभणी तालुक्यातील दैठणा येथील मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या दोन महिलांचा चार चाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली परभणी गंगाखेड रस्त्यावरील दैठणापासून दोन किमी माळ सोना फाट्याजवळ हा अपघात झाला असून दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे पुष्पा उत्तम कछवे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परभणी उत्तमराव कच्छवे यांच्या पत्नी,तर अजनाबई सुरेशराव शिसोदे असे मयत झालेल्या महिलांची नावे आहेत
परभणी तालुक्यातील दैठणा येथील मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या दोन महिलांचा चार चाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली परभणी गंगाखेड रस्त्यावरील दैठणापासून दोन किमी माळ सोना फाट्याजवळ हा अपघात झाला असून दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे पुष्पा उत्तम कछवे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परभणी उत्तमराव कच्छवे यांच्या पत्नी,तर अजनाबई सुरेशराव शिसोदे असे मयत झालेल्या महिलांची नावे आहेत
दादर येथील कबूतर खाना इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतर खाना बंद करण्यात आला होता. यावरून जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते
अचानक जैन समाज आक्रमक झाला आणि त्यांनी कबुतर खाण्यावरील झाकण्यात आलेली ताडपत्री काढून टाकली. यामुळे जैन समाज बांधव आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट देखील झाली. त्यामुळे येथे तणाव देखील निर्माण झाला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली असून कबूतर खाना इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे
बदलापूर पुर्व रिंग रूट परिसरात एका पान टपरीवर काही गुंडांकडुन दगडफेक करून टपरीची नासधूस करण्यात आली आहे,पान टपरी मालकाने शासनाने बंदी घातली असलेला गुटखा दिला नसल्याचा राग धरत, टपरीतील सामानाची तोडफोड करण्यात आली आहे, दिवसाढवळ्या असा प्रकार घडत असल्याने पनवेल परिसरात दहशतिच वातावरण निर्माण झाल आहे, पनवेल हायवे परिसरात सातत्याने असे गुन्हेगारी प्रकार घडत असुन, बदलापूर पुर्व पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे
काल नोटीस देवून सोडल्यानंतर आज पुन्हा पोलिसांनी बोलवलं
पालिका कामबंद आंदोलनात गोंधळ घालू नये यासाठी साडे दहा वाजताच चौकशीला बोलवलं
किशोर शिंदे, प्रशांत मते, अविनाश जाधव, महेश लाड व इतर लोकांवर गुन्हा दाखल
महानगरपालिकेमध्ये काल मनसेने आंदोलन केलं होतं त्या संदर्भात हा गुन्हा दाखल
पालिकेचे कर्मचारी अमोल पवार यांनी दिली फिर्याद
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांना धमकी दिली
तुम्हाला महाराष्ट्र मध्ये राहू देणार नाही असं बोलून शासकीय कामात अडथळा निर्माण केला
सभागृहाच्या बाहेर आल्यावर त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी मुख्य गेटमधून आत मध्ये शिरले..
एमआयटी कॉलेज बाहेर मारामारी
विध्यार्थीन मध्ये हाणामारी झाली या हाणामारीचा कारण समजू शकले नाही
सोशल मीडिया वरती मारामारीचा व्हिडिओ व्हायरल
कोथरूड परिसरातील कॉलेज बाहेरील हा सर्व प्रकार
कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मारामारीमुळे भेटीचे वातावरण
- आम्हाला पंचनामा, नुकसान भरपाई नको तर हमीभाव द्या
- सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान
- मुसळधार पावसामुळे 2 एकरावरील टोमॅटो पिकाच्या बागेत पाणीच पाणी झाल्याने शेतकरी हतबल
- अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक केवळ एकमेकांवर टीका करतातर शेतकऱ्याचा प्रश्न कोणीही मांडत नाही
- कोणी रम्मी खेळली, कोणी मारामारी केली कोणाचा बारच आहे यावरच नेते मंडळी बोलले मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले
उद्या दुपारी चार वाजता नरिमन पाईन्ट इथं होणार बैठक
उद्याच्या बैठकीत पुनरयाचिका दाखल करण्याचा मसुदा तयार केला जाणार.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खालिद का शिवाजी हा प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटातून तथ्यहीन माहिती दिली जात असल्यामुळे हा चित्रपट सुरू होण्याआधीच बंदी आणावी या प्रमुख मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली... या चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणारी दृश्य ही कोणत्याही ऐतिहासिक तज्ञांचा सल्ला न घेता दाखवण्यात आली असल्याने या चित्रपटावर प्रदर्शित होण्याआधी तथ्यहीन वाक्यांची सुधारणा करावी अन्यथा बंदी आणावी ही मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
- उपराजधानी नागपुरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्नात असलेल्या दोघाना तहसील पोलसांनी अटक केलीय.."
- जमीनरून हुसेन लोकमान शेख हुसेन आणि अजीम टानू शेख असं आरोपीचा नाव आहे..ते दोघेही पश्चिम बंगालचे आहे...
- तहसील पोलिस स्टेशन हद्दीत मध्ये गार्ड लाईन परिसरातून रात्री दोघांकडून 1 लाख 21 हजाराचा पाचशेच्या 243 बनावट नोटा जप्त केल्या आहेय...
- त्यामुळे अटकेपूर्वी आरोपींनी अनेक नोटा चलनात आणल्या असाव्या असा संशय व्यक्त केला जात आहे..
- पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर मेयो हॉस्पिटलच्या गार्ड लाईन परिसरात दोन व्यक्ती बनावट घेऊन येताच अटक करण्यात आलीय...
मीरा-भाईंदर शहरात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेल्या केम छो डान्स बारवर भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सोमवारी कारवाई करून 16 ते 17 बारबाला ताब्यात घेत काही मुद्देमाल देखील हस्तगत केला होता.
बुधवारी मीरा भाईंदर महानगर पालिकेला परिवहन मंत्र्यांनी बारवर तोडक करण्याचे आदेश दिले होते. पालिका मोठ्या बंदीबस्तात या ठिकाणी कारवाईसाठी पोहोचले मात्र या बारवर केवळ दिखा
बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यात पावसाने दमदार बंटिंग केली, सोनोशी महसुल मंडळात काल सायंकाळी अचानक वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार पावसाने हजेरी लावली .. तब्बल एक तास पडलेल्या या पावसामुळे शेत कामगारांमध्ये तसेच शेतकऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली.. या पावसामुळे सोनोशी येथील नदीला मोठा पूर आला होता ... दरम्यान पुलावरून पाणी वाहू लागल्याने राहेरी ते वर्दडी मार्ग दोन ते तीन तास वाहतुकीसाठी बंद पडला होता.. तर जांभोरा येथील पुलावरून सुद्धा पाणी वाहत होते, त्यामुळे रोडवर वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या.. तर शेतातून घरी येणारे शेतकरी , मजूर सुद्धा या पाण्यामुळे अडकून पडले होते.. दोन्ही पुलावरचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावरती असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीची पाहणी केली इमारतीचे बांधकाम सुरू असून यावेळी त्यांनी पाहणी करताना पायऱ्या थोड्या बारीक आहेत काम चांगली करा लागेल तेवढा निधी देतो मात्र चुकीचे काम खपवून घेणार नाही चांगली काम करा दर्जेदार काम केले तर पैसे मिळतील असे कॉन्ट्रॅक्टरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडे बोल सुनावले यावेळी ते जिल्हाधिकारींसह संबंधित अधिकाऱ्यांना ही ते म्हणाले की मला नुसते कागदावर चालणार नाही दुसऱ्या वेळेस पाहणी ला आल्यानंतर मला सगळं व्यवस्थित दिसले पाहिजे.
पुण्यातील एमआयटी कॉलेज बाहेर मारामारी
विध्यार्थीन मध्ये हाणामारी झाली या हाणामारीचा कारण समजू शकले नाही
सोशल मीडिया वरती मारामारीचा व्हिडिओ व्हायरल
कोथरूड परिसरातील कॉलेज बाहेरील हा सर्व प्रकार
कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मारामारीमुळे भेटीचे वातावरण
मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या आंब्याच्या बागेत देवगड हापूस कलमांना मोहर आला आहे. चक्क जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात हा मोहर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. थंडीच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहोर जुलै महिन्यात आल्यामुळे कुतूहलाचा विषय बनला आहे. हा मोहर फोंडेकर यांनी औषध फवारण्या करून भर पावसाच्या हंगामातही टीकवून ठेवला आहे. नोव्हेंबर महिन्यात हा आंबा तयार होणार असून आंबा पेटीला दहा हजारापर्यंत भाव मिळणार आहे. फोंडेकर हे प्रगतशील शेतकरी असून या अगोदर सुद्धा त्यांनी गेल्या वर्षी मालवण तालुक्यातून पहीलीच पाच डझनाची हापूस आंब्याची पेटी गोव्याला पाठवली होती.
एक राखी जवानांसाठी या उपक्रमा अंतर्गत धुळ्यातून बहिणींनी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राख्या पाठविल्या आहेत, धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला बहिणींनी आपल्या हाताने या राख्या पाठविल्या आहेत,
यावर्षी ऑपरेशन सिंदुरच्या धर्तीवर सीमेवरील जवानांसाठी देशाच्या कान्या कोपऱ्यातून थेट श्रीनगर पर्यंत प्रवास करून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक राख्या संकलित करीत आहेत, एक राखी जवानांसाठी देशाच्या सन्मानासाठी या भावनेतून हा राखी सन्मान रथ शिर्डी पासून जम्मू काश्मीर श्रीनगर पर्यंत प्रवास करीत आहे, एक लाख हून अधिक राख्या आपल्या वीर जवानांसाठी आणि त्यांच्या त्यागासाठी पाठविण्याचा संकल्प आखण्यात आला असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.
वनतारासाठी सांगलीच्या तासगाव गणपती संस्थानच्या गौरी हत्तीणीला दोन ते तीन कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट संस्थांच्या विश्वस्तांकडून करण्यात आला आहे.एका कथित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून गौरी हत्तीनीला अनफिट असल्याचे सर्टिफिकेट देण्या बरोबर, वनतारा संस्थेचे माध्यमातून दोन ते तीन कोटी रुपये मिळतील,अशी ऑफर देण्यात आल्याचा दावा गणपती पंचायतन संस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी केला आहे, तसेच हत्तीबाबत किडनॅपिंगची प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील पटवर्धन यांनी केला आहे.नांदणी मठाच्या माधुरी हत्तीच्या पार्श्वभूमीवर तासगावकरांच्या गजलक्ष्मी उर्फ गौरी हत्तीच्या संरक्षणासाठी येत्या संकष्टीपासून सह्यांची मोहीम देखील राबविण्यात येणार असल्याचं राजेंद्र पटवर्धन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.तासगाव गणपती पंचायत संस्थानकडुन गेल्या 40 वर्षांपासून गौरी हत्तीनीचा संभाळ केला जातोय,या पुढच्या काळात देखील तिचा देखभाल योग्य पद्धतीने होत राहील,असा विश्वास देखील राजेंद्र पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे,मात्र वनताराबद्दल केलेल्या पटवर्धनांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या मालेगाव मध्ये बनावट आयडी द्रवारे ५ शाळां पैकी बनावट आयडी व तुकडी मान्यतां पत्राद्रवारे शिक्षण विभागाकडून बॅक डेटेड वैयक्तिक मान्यता घेण्यात आली असून शासनाकडे नोंद नसलेल्या एका शाळेला तब्बल १०० टक्के अनुदान देण्यात आला आहे.या पाच शाळां मध्ये एकुण ९८ शिक्षक,४ शिपाई,५ लिपिक अशा एकुण १०७ शिक्षणकर्मींना नियमबाह्य नियुक्त्या दिल्या गेल्या असून या सर्वांनी वेत व फरकासह शासनाची सुमारे २५ कोटींचा अपहार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.या पाच शाळांपैकी स्वेस,सरदार व मालेगाव बडी हायस्कुल यांच्या विरोधात अगोदरच गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळपासून मुंबई शहरामध्ये पावसाला रिमझिम सुरुवात झाली आहे त्यामुळे क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर आज पावसाने मुंबई शहरात हजेरी लावलेले आहे तसेच अचानक पावसामुळे चाकरमानी आणि प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे तसेच लोकल सेवा सुद्धा सुरळीत आहेत
- वाहतूक पोलिसासाठी डील करतोय रिक्षावाला
- नाशिकमध्ये वाहतूक पोलिसासाठी डील करणाऱ्या रिक्षाचालक आणि वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल
- शंभर, दोनशेमध्ये काय येतं? दारूचे भाव किती वाढले? पाचशे रुपये द्यावे लागतील
- रिक्षाचालकाचा वाहनचालकावर दबाव, पाचशे रुपये दिल्यानंतर वाहतूक पोलिसाने वाहनचालकाला सोडलं, व्हायरल व्हिडीओ
- सीट बेल्ट न लावल्याने दंड करण्याऐवजी वाहतूक पोलिसांकडून ५०० रुपयांची चिरीमिरी
- धुळ्याच्या वाहनचालकाने केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे वाहतूक पोलिसांचा वसुली कारभार चव्हाट्यावर
- शहरात बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करण्याऐवजी रिक्षाचालकांनाच बनवलं वसुली एजंट?
तालुक्यातील प्रत्येक घरातून एक भाकरी गोळा करून, ती मुंबईला येणाऱ्या आंदोलकांना जेवण्याची सोय व्हावी म्हणून पोहचवण्यात येणारं
मुळशी आणि पुण्यातील कोथरूडच्या जे डी या मराठा नागरिकांच्या ग्रुपकडून हे नियोजन करण्यात येणारेय
29 तारखेच्या जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आंदोलनाला पाठींबा देऊन पुढील नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यातं आली.. त्या दरम्यान हा निर्णय घेण्यातं आला..
29 तारखेच्या आंदोलनाला मोठ्या संख्येने मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता असल्यानं, या सर्वांची व्यवस्थित जेवणाची सोय व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यातं आलय..
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे दोन दिवसाच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. अजित पवार यांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच दौरा सुरू केला आहे. शहरातील चंपावती क्रीडा संकुल, श्री क्षेत्र कंकालेश्वर मंदिर परिसराची त्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना काम व्यवस्थित करून घेण्याच्या सूचना दिल्या. सकाळपासूनच अजित पवार यांचा दौरा सुरू झाल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांची मात्र पळापळ होताना पाहायला मिळाली. आज दिवस भर अजित पवार यांचे विविध कार्यक्रम शहरात आहेत..
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सात शाखांमध्ये झालेल्या अनियमितीचे आता चौकशी होणार असून या शाखांमध्ये आतापर्यंत झालेल्या अनियमितेची चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय निबंधक गौतम वर्धन यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत या संदर्भातील एक पत्र नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे.त्यामुळे एकाच खळबळ माजली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जांब बाजार, आर्णी, महागांव,हिवरा, दिग्रस, कोल्ही आणि कलगाव या शाखेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे.
धाराशिवच्या मुरुम येथील विठ्ठलसाई साखर कारखान्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन
काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री बसवराज पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच करणार शक्ती प्रदर्शन
दोन दिवसांपूर्वीच 100 हून अधिक आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर होणार शक्तिप्रदर्शन
बसवराज पाटील यांच्याकडून मेळाव्यासाठी जय्यत तयारी!
मंगळवारी दुपारी एक विचित्र अपघाताची घटना घडली होती. लोखंडी सळई डोक्यात घुसल्याने जखमी झालेल्या सोनू अली याच्यावर पाच तासांच्या शस्त्रक्रिये करण्यात आली जखमी रुग्णाची प्रकृती स्थिर असून सोनू अली यावर उपचार करणाऱ्या डॉ.श्रुती शेळके यांनी दिली आहे.
मेट्रो प्रकल्प पुलावरून पडलेली लोखंडी सळई रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याची घटना मंगळवारी नारपोली परिसरात घडली होती.या अपघातातील जखमी सोनू अली याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या अपघात प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून जखमी सोनू अली यास योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील दर्शन 20 ऑगस्टपर्यंत बंद , काम अपूर्ण राहिल्याने सुरळीत दर्शन सुरू होऊ शकत नाही मंदिर संस्थानची माहिती
देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील संवर्धनाच्या कामासाठी सुरुवातीला एक ते दहा ऑगस्ट दरम्यान दर्शन बंद
आता दर्शन बंद कालावधी आणखी दहा दिवसांनी वाढवला,आता 20 ऑगस्ट पर्यंत गाभाऱ्यातील दर्शन बंद, भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार
देवीचे मुखदर्शन, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा नियमती सुरू राहणार
20 ऑगस्टपर्यंत गाभाऱ्यातील दर्शन व्यवस्था बंद राहणार, कालावधी वाढवल्याची मंदिर संस्थानची माहिती
अकोला पोलिसांची शहर वाहतूक शाखा 'ॲक्शन मोड'मध्ये पाहायला मिळालीय. शहरात नियमांची पायमल्ली करत बेशिस्त वाहतूक करणाऱ्या 104 ऑटोंवर पोलिसांनी कारवाई केलीये. शहरातील बस स्थानक चौक, रेल्वे स्टेशन चौक, गांधी चौक आणि शहरातील मुख्य चौकांमध्ये ही कारवाई करण्यात आलीय. कारवाई करण्यात आलेले सर्व 104 ऑटो जिल्हाधिकारी कार्यालयासमोरली शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात आलीय. या सर्व ऑटोंवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्या चालकांचं समुपदेशन करण्यात आलंय. वाहतूक नियमांचे पालन करण्याचं आवाहन शहर वाहतूक शाखेने ऑटो चालकांना केलंय.
अकोला शहरातल्या रामदासपेठ पोलिसांनी 15 किलो गांजा जप्त केलाय. रेल्वे स्टेशन चौकात नाकाबंदी दरम्यान हा गांजा जप्त करण्यात आलाय. एका ऑटोतून या गांजाची तस्करी करण्यात येत होतीय. याप्रकरणी पोलिसांनी सोहेल अहमद अब्दुल शकील आणि शेख हमीद शेख रशीद या दोन आरोपींना अटक केलीये. पोलीस कारवाईत 15 किलो गांजा, ऑटो आणि दोन मोबाईलसह दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय.
अकोल्यातल्या अकोट फैल आणि चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात सुरु असलेल्या हातभट्टी दारू अड्डा पोलिसांनी उध्वस्त केलाय.. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या दोन्ही दारू हातभट्टी अड्ड्यावर कारवाई केली.. यावेळी शेताशिवारातल्या नदीकाठी अनधिकृतपणे गावठी दारुची हातभट्टी अकोला पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तसेच दारू बनविण्यासाठी वापरले जाणारे साहित्य देखील जप्त करण्यात आले. यादरम्यान दारू हातभट्टी चालकासह इतर काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, अनकेदा दारू हातभट्टी अड्ड्यावर कारवाई केली जाते. दारु साठा आणि लागणारे साहित्य पोलीस जप्त करतात. मात्र काही दिवसांनी त्या दारू हातभट्या पुन्हा सुरू होतात. त्यानंतर अधून मधून पुन्हा कारवाई केली जाते. दारु आणि दारू गाळप करणाऱ्यावर लोकांवर कारवाई करण्याची पहिली जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहेय. मात्र, ती होताना दिसत नाहीए.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.