एमपीसीबीचा दणका पुण्यातील २५ टक्के 'आरएमसी' प्रकल्पांना टाळे
काँक्रीटचा पुरवठा करणारे रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पही वाढत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गेल्या वर्षीपासून पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील २५ टक्क्यांहून अधिक आरएमसी प्रकल्पांना टाळे ठोकले
पुणे जिल्ह्यात एकूण ३५० आरएमसी प्रकल्प आहेत. त्यापैकी पुण्यात १०५, पिंपरीं-चिंचवडमध्ये १२२ आणि ग्रामीण भागात १२३ आरएमसी प्रकल्प आहेत.
प्रदूषण नियमांचा भंग केल्याप्रकरणी १०३ आरएमसी प्रकल्पांना कारवाईची पहिली नोटीस बजाविण्यात आली. तसेच, १२ प्रकल्पांना पुढील कारवाईची दुसरी नोटीस बजावली गेली.
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत आणि देहू रोड परिसरामध्ये काल रात्री बिबट्या आढळून आला आहे. रावेत आणि देहू रोड परिसरामध्ये काल रात्री बिबट्या आढळून आला आहे. या बिबट्याने एका कुत्र्याची शिकार देखील केली आहे. त्यामुळे रावेत आणि देहूरोड परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक रावेत देहू रोड परिसरामध्ये बोलवण्यात आला आहे. रावेत परिसरातील मस्के वस्ती आणि देहू रोड ऑडनेस फॅक्टरी परिसरामध्ये या बिबट्याचा वावर सध्या होत आहे.
जालन्यात स्क्रॅपच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.जालना शहरातील खरपुडी रोडवरील स्क्रॅपच्या दुकानाला मध्यरात्री अचानक आग लागलीय.आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.या आगीमध्ये जवळपास सात ते आठ दुकानांसह दोन चारचाकी वाहने जळून खाक झाल्याची माहिती आहे.दरम्यान अग्निशमक दलाने पाच तासाच्या अथक प्रयत्ननंतर आग आटोक्यात आणली आहे.
खासगी संस्थांच्या परीक्षांना झेडपी शाळांमध्ये बंदी
शिक्षण समितीच्या पहिल्याच बैठकीत ठराव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये खासगी संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या बाह्य परीक्षांना पूर्णतः बंदी घालण्याचा ठराव शिक्षण व क्रीडा समितीच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला*
शासन व जिल्हा परिषद यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थांच्या परीक्षा शाळांमध्ये आयोजित करू नयेत, असा ठराव मंजूर
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त परीक्षांचा ताण कमी होणार असून शैक्षणिक प्रक्रियेला अधिक शिस्तबद्धता येण्याची अपेक्षा
हिंगोली जिल्ह्यात काल वादळी वारे आणि अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे, तर याच वादळीवाऱ्याने आग लागल्याची देखील घटना घडली आहे, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ गावात वादळी वाऱ्याने विजेच्या तारांवर शॉर्टसर्किट झाले आणि त्याच्या आगीच्या ठिणग्या शेतकऱ्याच्या घरावर पडल्या त्यामुळे मोठी आग लागली आहे या आगीत विनोद लोणकर व विनायक तुरुकमाने या दोन शेतकऱ्यांची घरे भस्मसात झाली आहेत, घरातील संसार उपयोगी साहित्य धान्य आणि शेतकऱ्यांनी हळद विक्री करून घरी आणलेले रोकड देखील जळाली आहेत.
हत्तीपाय रोगाचे पुणे जिल्ह्यात 44 रुग्ण
पुणे पिंपरी चिंचवड सह ग्रामीण भागात शिरकाव
लिम्फॅटिक फिलेरियासिस (हत्तीपाय) या आजाराचा ‘सायलेंट’ प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सक्रिय सर्वेक्षणासाठी रात्री विशेष मोहीम
विदर्भातील जिल्ह्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या हत्तीपाय रोगाचा शिरकाव आता पुण्यातही
बहुतांश रुग्ण इतर जिल्ह्यातून स्थलांतरित झाले असल्याची माहिती
वर्षभरासाठी विशेष पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला असून, उच्च-जोखमीच्या भागांमध्ये तपासणीवर भर दिला जाणार
या आजारात मायक्रोफिलेरिया रात्री रक्तात जास्त प्रमाणात आढळतात, तर दिवसा ते शरीराच्या खोल भागात लपलेले असतात. त्यामुळे रात्री घेतलेले रक्तनमुने अधिक अचूक निदानासाठी उपयुक्त ठरणार
धाराशिव मध्ये सलग चार दिवसापासून पेट्रोल डिझेलची टंचाई
टंचाईचा शेती कामांना मोठा फटका,पेरणीपूर्व मशागतीची काम खोळंबली
डिझेल नसल्याने ट्रॅक्टरची चाक जाग्यावरच, मोठ्या प्रमाणात नांगरणी बाकी
शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर मालकाकडे येरझाऱ्या नांगरणी बाकी,
ट्रॅक्टर चालक डिझेलच्या प्रतीक्षेत, शेतातील नांगरणीची काम थांबली
अनेक पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर मालकांच्या रांगा
नागपूर शहर पोलीस दलातील सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह नऊ जणांचे निलंबन
एकाच वेळी 9 जणांवर निलंबनाच्या कारवाईमुळे नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे...
नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी ही कारवाई केली आहे...
पाचशे रुपयांच्या बॅटिंगच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात वरिष्ठांची परवानगी न घेता सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी थेट मुंबई पुण्यापर्यंत तपास केला.
पवनी तालुक्यातील नेरला परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजविणाऱ्या आणि तब्बल २६ शेळ्यांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. अड्याळ जवळील नेरला २६ शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतर जवळील कालव्याच्या सिमेंट पाईपमध्ये बिबट्याने आश्रय घेतला होता. पाईपमध्ये लपलेल्या बिबट्याला बाहेर काढणे मोठे आव्हान होते. मात्र रात्री त्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश आले. बिबट्याला जेरबंद करून वैद्यकीय तपासणी प्रक्रियेनंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.
धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कृञिम तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी व गैरप्रकारांवर कारवाई करावी
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची जिल्हाधिकारी व प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे मागणी
सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाची आर्थीक पिळवणूक,शेती कामांनाही बसतोय फटका
प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन साठ्याची पारदर्शक माहिती जाहीर करावी, खासदार ओमराजे निंबाळकर यांची पञाद्वारे मागणी
९ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या "नराधम आजोबा" वर गुन्हा दाखल
"नराधम आजोबा" ला ठोकल्या पोलिसांनी बेड्या
पुण्यातील पर्वती मध्ये झालेल्या प्रकरणात नराधमाला अटक
९ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
दारूच्या नशेत "आजोबाकडून" चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
रात्री उशिरा या ज्येष्ठ व्यक्तीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कारवाई
पुण्यातील नवले पुलासह शहरातील संवेदनशील ठिकाणी आंदोलनास मनाई
नसरापूर येथील घटनेनंतर नवले पुलावर झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा निर्णय
शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी आंदोलन आणि ‘रास्ता रोको’ करण्यास मनाई
नसरापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी एकत्र येत अचानक नवले पूल परिसरात ठिय्या आंदोलन केले होते
अनेकदा आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो
यापुढे नवले पूल परिसर तसेच शहरातील कोणत्याही संवेदनशील चौकांमध्ये किंवा रस्त्यांवर आंदोलनास किंवा ‘रास्ता रोको’ला पोलिसांकडून कोणतीही परवानगी दिली जाणार नाही
नसरापूर अत्याचार प्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार
या प्रकरणातील नराधमाला फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू
येत्या १५ दिवसांत जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती
विशेष पथकाकडून फिर्यादी आणि आरोपींच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविण्याचे काम वेगात सुरू
या नराधमाला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांकडून भक्कम तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे एकत्रित करण्याचे काम
धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसून सर्व पंपांवर नियमित पुरवठा सुरू आहे.त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी,असे आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.इंधन टंचाई निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अतिरिक्त साठा करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.मात्र,जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.तसेच,जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पेट्रोल पंपांची सखोल तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.तपासणीदरम्यान कोणताही दोष आढळल्यास संबंधित पंप चालकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.काही अडचण आल्यास नागरिकांनी थेट जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
माण आणि खटाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून प्रशासन या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप शरद चंद्र पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत विरकर यांनी केला आहे. तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरे-ढोरे घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. सध्या माण तालुक्यातील ५५ ते ६० गावांनी प्रशासनाकडे टँकरची अधिकृत मागणी केली आहे. मात्र प्रशासनाने केवळ १७ गावांनाच टँकर मंजूर केले आहेत. उर्वरित गावांतील नागरिकांनी पाणी कोठून आणायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागात २०० लिटर पाण्यासाठी सर्वसामान्यांना ५० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. यावेळी त्यांनी मान खटाव विधानसभेचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता यांच्यावर निशाणा साधत टीका केलीये "स्वतःला 'जलनायक' म्हणवून घेणाऱ्या नेत्यांच्या तालुक्यात जर जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असेल, तर हे त्यांचे अपयश आहे. केवळ घोषणाबाजी करण्यापेक्षा जमिनीवर उतरून लोकांची तहान भागवणे जास्त महत्त्वाचे असल्याचे यावेळी ते म्हणाले याबाबतचे निवेदन शप चे राज्य प्रवक्ते प्रशांत विरकर यांनी केला आहे
पुण्यातील पर्वती परिसरात नऊ वर्षांच्या मुलीवर तिच्याच आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर नागरिकांकडून पर्वती पायथा परिसरात रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते.
महाराष्ट्रात शालेय शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडणार असून इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने मंजुरी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.