dilip walse patil on sharad pawar statement (1).jpg 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : शरद पवारांना सोडायचा प्रश्न येत नाही, वळसे पाटलांचे मोठं वक्तव्य, VIDEO

Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवारांना सोडायचा प्रश्न येत नाही... ब-याच लोकांना आतल्या गोष्टी माहिती नाही, असे वक्तव्य वळसे पाटील यांनी केलेय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडल्यावरुन मोठं विधान केलं आहे.

काही लोकं विचारतात की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं? पण शरद पवारांना सोडायचा प्रश्नच येत नाही. करापण बऱ्याच लोकांना आतल्या गोष्टी माहीत नाहीत, असं म्हणत वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं नसल्याचे संकेत दिलेत.

वळसे पाटील काय म्हणाले?

पक्षाच्या 54 आमदारांची बैठक बोलावली व त्यात सरकारमध्ये जाण्याची चर्चा झाली. आपण सरकारमध्ये जायचं ठरलं, दुसऱ्या पक्षात नाही. आपण कोणत्या पक्षात गेलो नाही, आपला पक्ष राष्ट्रवादी व चिन्ह घड्याळच आहे. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं होतं. गेल्या दोन वर्षांत अजितदादा अर्थमंत्री आसल्याने त्यांनी भरभरून पैसा दिला व आपली कामे झाली. राजकरणात अशा गोष्टी घडतात कधी कधी.

एकदा आपण पुलोद स्थापन केलं, एकदा काँगेस मधून NCP स्थापन केली. तसं आज राजकरणात काही बदल झाला. हा बदल परिस्थिती प्रमाणे हाताळायचा असतो. याचा अर्थ लगेच आपण साहेबांचे दुश्मन झालो, साहेब आपले दुश्मन झाले असं नाही. त्यांच् बाबत प्रेम व आदर आजही आपल्यात आहे. पण विरोधकांकडे मुद्दे नाहीत, काही भांडवल नाही, बोलायला मुद्दे नाहीत म्हणून हे भावनिक मुद्दे मांडले जात आहेत, असे वक्तव्य वळसे पाटील यांनी केलेय.

कोट्यवधी रुपयांचा निधी -

आज मी मंत्री मंडळात नसतो तर एवढी कोटी कोटी रुपयांची कामे एका एका गावात आली नसती. माझ्या मतदारसंघात कोणत्याही गावात जा दोन चार कोटी निधी आलाच आहे. मंचरला 85 कोटी रूपये दिलेत. तिथे किती मतदान होते किंवा होईल हे महत्वाचे नाही तर आपले मंचर सुधारलं पाहिजे हा त्यामागील हेतू आहे, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाची लाडक्या बहिण योजनेला स्थगिती, मंत्री वळसे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

निवडणुक आयोगाने लाडक्या बहीण योजनेला स्थगिती दिल्याचे समजलं. या मुद्द्यावर विरोधक तुम्हाला फासवायचे काम करतील. योजना जुलै महीन्यात सुरु झाली,योजनेचा आता चौथा महिना चालू आहे. चार महिन्याचे 6000 रूपये मिळायला हवे होते पण तुम्हाला 7500 रूपये मिळालेत. हे जास्तीचे 1500 रूपये तुम्हाला पुढच्या महिन्याचे दिलेले आहेत. कारण सरकारला हे माहीत होते की निवडणुक आयोग निवडणुक काळात आचारसंहितेच्या नावाखाली या योजनेला बंदी घालेल. त्यामूळे आम्ही आगोदरच मंत्री मंडळात निर्णय घेऊन एक महिन्याचे आगाऊ पैसे दिले आहेत, असे वळसे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT