बातम्या

मुंबई: वरळीत भीषण कार अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू

साम टीव्ही न्यूज


मुंबई:  भरधाव कारवरील ताबा सुटल्याने वरळीत भीषण अपघात घडला आहे. या अपघातात कार चालवणारी महिला बचावली असली तरी तिला सहा वर्षांच्या मुलीसह आईलाही गमवावं लागलं आहे. अपघाताबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.


 जखमी महिलेचे नाव नमिता चंद असे असून त्यांना उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नमिता या अंधेरीतील राहणाऱ्या आहेत, असे सांगण्यात आले. या अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला त्यात नमिता यांची सहा महिन्यांची मुलगी, ७० वर्षीय आई व ६२ वर्षीय नातेवाईक यांचा समावेश आहे.
नमिता चंद  ही कार भरधाव चालली होती. कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालवत असलेली महिला गंभीररित्या जखमी झाली.

कार भरधाव वेगाने चालवत असताना अचानक कार स्पीड ब्रेकरवर चढली आणि कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. डिव्हायडरला वेगाने आदळल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे. वरळीतील मेला रेस्टॉरंट जंक्शनवर हा अपघात झाला. 

WebTittle ::  Three killed in car accident in Worli

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT