अकोला - कोरोनाची Corona सध्याची लाट येणार आहे, याची माहिती आरोग्य विभागाने नोव्हेंबर November महिन्यात दिली होती. परंतु महाराष्ट्रातील Maharashtra तीन पायाच सरकार किंवा केंद्रातील भाजपच BJP सरकार Government यांनी याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या लाटे बद्दलही सूतोवाच केला होता. सुरवातीला जे इन्फ्रास्ट्रक्चर होत. ते तसं न ठेवता मोडून टाकलं. मग दुसऱ्या लाटेत अनेकांना रुग्णालयात बेड मिळाले नाही, ऑक्सिजन Oxygen मिळाले नाही यामुळे अनेक जण दगावले. असा आरोप करत, हरगर्जी पणा केल्यामुळे मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी Prakash Ambedkar दिला आहे. ते अकोल्यातील पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. So why not file a case against this government Prakash Ambedkar
कोविड सेंटर Covid Centre म्हणून उभं करत असलेली संकल्पना बंद करून प्रत्येक हॉस्पिटलला कोविड रुग्ण तपासण्याची परवानगी दिली पाहिजे, किंवा सक्ती केली पाहिजे. जे हॉस्पिटल करणार नाहीत त्याच लायसन्स रद्द केलं पाहिजे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी सरकारला दिला आहे.
हे देखील पहा -
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रापेक्षा आणि महाराष्ट्रभर वणवण फिरण्यापेक्षा, नागपूरमध्ये बसावं दोन-चार कोविड सेंटर काढून सोया द्यावी. असा टोला आंबेडकरांनी फडणवीसांना लगावला. So why not file a case against this government Prakash Ambedkar
मोहन भागवत Mohan Bhagvat हॉस्पिटलमध्ये भरती असताना , त्यांचा दिवसाचा आहार काय होता. असा प्रश्न व्यंगात्मक हास्य करत प्रकाश आंबेडकरांनी केला. दरम्यान आंबेडकर यांनी लसिकरणावरून केंद्र सरकारवर सुद्धा निशाना साधला आहे. दुर्देवाने मोदी सरकारने आपल्या देशात लसीकरणाची नोंदणी उशिरा सुरू केली. म्हणून लसीचा तुटवडा होत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.