बातम्या

त्रिपुरात भाजपचे कमळ फुलवणारे महाराष्ट्रीय सुनील देवधर

मृणालिनी नानीवडेकर

मुंबई : सुनीलजी, आपसे हमे यहां जीत चाहिए असे सुनील देवधरांना थेट सांगितले होते ते त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. देवधर यांना जबाबदारी दिली होती ती गुजरातमध्ये दमोह जिल्ह्याची. हा जिल्हा कॉंगेसचा बालेकिल्ला म्हणूनच समजला जात होता. 2013 च्या गुजरात च्या त्या विधानसभा निवडणुकीत सुनील देवधरांनी किमया केली आणि तिथे 3-3 अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या जिलह्यात कॉंग्रेसला भाजपने आव्हान तर दिलेच पण दणदणीत विजयही मिळवला. तेच सुनील देवधर आज त्रिुपरातल्या भाजप विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

डाव्यांच्या बालेकिल्यात भाजपचे कमळ फुलवणे हे खरेतर स्वप्नच. पण सुनील देवधर यांनी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. त्रिपुरातला भाजप विजय हा सुनील देवधर आणि त्यांच्या चमुची किमया आहे. देवधर गेली 12 वर्षे ईशान्य भारतात काम करत आहेत. मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेल्या देवधर यांनी आपल्या नियोजबद्ध धोरण आणि संघटनात्मक बांधणीच्या बळावर त्रिपुरा भगवा केला आहे.

दमोह जिल्ह्यातल्या कामगिरीनंतर देवधर यांच्यावर वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. तिथे विभागप्रमुख म्हणून काम केल्यावर त्यांना त्रिपुरात पाठवण्यात आले. त्रिपुरात भाजपचे तशा अर्थाने फारसे कामच नव्हते. पण देवधर यांनी संघाच्या पद्धतीने तिथे कामला सुरवात केली त्यांनी मुळापासून काम करून तिथल्या लोकसंख्येत महत्वाचा वाटा अशलेल्या ओबीसी समुहाला एकत्र केले आणि भाजपचे नेटवर्क उभएकेले. परिवारातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या हाकेला ओदेऊन तिथे धाव घेतली. देवधर यांनी या लढाईला वैचारिक संघर्षाचे रुप देऊन त्रिपुरातली माणिक सरकारविरोधात तिथे मोठी जनजागृती केली.

दिनेश कांजी या पत्रकाराच्या मदतीने त्यांनी माणिक सरकारविरोधात पुसल्तकही लिहून घेतले. देवधर यांच्या चमुत पुण्यातील तरुणाचा सहभाग मोठा आहे. तसेच देवधर यांनी गावपातळीपर्यंत केलेली बांधणी लक्षात घेऊन मोदी- शहा यांनी देखील त्रिपुरात सभांचा धडाका लावला. मतदानानंतरच्या चाचण्यांपूर्वीच देवधर यांनी त्रिपुराचा लाल रंग भगवा होणार हे स्पष्ट केले होते. हा वैचारिक विजय असल्याची प्रतिक्रया देऊन ते मोकळेही झाले होते. ज्येष्ठ दिवंगत पत्रकार वि. ना. देवधर यांचे चिरंजीव असलेले पक्के मराठी सुनील देवधर आज भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारातले महत्वाचे मोहरे ठरले आहेत हे नक्की. पुण्यातला अद्वैत कुलकर्णी, बारामतीचा सुमंत कोकरे, तसेच श्रावण झा त्याची पत्नी वर्षदा, पराग हा कट्टर संघ स्वंयसेवक आणि शिवानंद नाडकर्णी, अजित माळी हे काही सदस्य सुनील देवधरांच्या टीममधले, तशी देवधरांची टीम बरीच मोठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आज आपण श्वास घेतोय - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

SCROLL FOR NEXT