बातम्या

#SakalSaamExitPolls : मुंबईत भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी 02 जगा

सकाळ न्यूज नेटवर्क

एक्झिट पोल 2019 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. 

महाराष्ट्राचा अचूक अंदाज सकाळ आणि साम वाहिनी देत असून मुंबईत एकूण 06 जागा असून यापैकी भाजपला 02, शिवसेनेला 02 आणि राष्ट्रवादीला 02 जागा मिळतील असा अंदाज आहे. राष्ट्रवादीला मात्र मुंबईत एकाही जागेवर यश मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईत युती 06 पैकी 04 जागा कायम ठेवण्यात यश मिळवेल तर आघाडी 02 जागांवर यशस्वी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र, भाजप 03 तर शिवसेना 03 जागांवर यशस्वी झाली होती. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रावादीला एकही जागा जिंकता आली नव्हती 2019 च्या निवडणुकीत मात्र, राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता नाही आली तरी काँग्रेस 02 जागांवर यशस्वी होईल अशी शक्यता सकाळ आणि सामच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचा अचूक एक्झिट पोल साम वाहिनी देत असून 
सकाळ आणि साम वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा युतीलाच मिळतील, तर आघाडीनेही जोरदार लढत दिल्याचे चित्र आहे. युतीला 29 आणि आघाडीला 19 जागा मिळण्याचा अंदाज साम वाहिनी आणि सकाळच्या एक्झिट पोलने वर्तविला आहे.

Web Title: marathi news sakal saam exit polls mumbai shivsena and bjp may win 2 seats 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT