बातम्या

प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या लोकांनी त्यांच्या आत्म्याची हत्या केली - कैलाश सत्यार्थी

सकाळ न्यूज नेटवर्क

भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यानंतर आता नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या शरीराची हत्या केली होती. मात्र, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या लोकांनी त्यांच्या आत्म्याची हत्या केली.

नथुराम गोडसेला प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देशभक्त म्हटले होते. त्यावर सत्यार्थी म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या शरीराची हत्या केली होती. मात्र, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या लोकांनी त्यांच्या आत्माची हत्या केली.

तसेच असे लोक अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताची हत्या करत आहेत. महात्मा गांधी सत्ता आणि राजकारणापेक्षा मोठे आहेत. भाजप नेतृत्त्वाने या छोट्या फायद्याचा मोह न बाळगता संबंधित लोकांना पक्षातून तात्काळ काढायला हवे, असे कैलाश सत्यार्थी यांनी सांगितले. 

WebTitle : marathi news pragyasingh thakur killed soul of the mahatma gandhi kailash sathyarthi 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur Crime: भावकीच्या वादातून दोन गटात तुफान राडा.. बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; शिरुर तालुका हादरला

Supreme Court On Sandeshkhali Case : संदेशखाली प्रकरणी CBI चौकशी सुरूच राहणार; SC कडून बंगाल सरकारला झटका

Gold Wearing Benefits: सोने -चांदीचे दागिने घालताना घ्या ही काळजी, नाहीतर...

Devendra Fadnavis - Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज, नेमकी कशावरून जुंपली?

Dombivali News: लोकलगर्दीचा बळी! डोंबिवलीजवळ धावत्या ट्रेनमधून पडून २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT