बातम्या

निवडणुकीत दीड लाख मतांनी निवडून येणार : श्रीरंग बारणे

सकाळ न्यूज नेटवर्क

पिंपरी : आपण या निवडणुकीत दीड लाख मतांनी निवडून येणार असल्याचा ठाम आत्मविश्वास मावळमधील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे यांनी व्यक्त केला आहे. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला ते 'सरकारनामा'शी बोलत होते. आपण पवारांचा नाही,तर पवार घराण्याचा पराभव करणार असल्याची दर्पोक्तीही त्यांनी केली. 

घाटावरच नाही, तर घाटाखालीही आपल्याला चांगले मतदान व मताधिक्य मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. मतमोजणीला एक दिवस बाकी राहिल्याने टेन्शन आले आहे का अशी विचारणा केली असता टेन्शन घेणारा नाही, तर देणारा माणूस आहे, असे बाऱणे  म्हणाले. पवारांचा नाही,तर पवार घराण्याचा निश्चीत पराभव करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे चिंचवडचे आमदार यांनी लाखभर मतांचे लीड देणार असल्याचे सांगितले आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, घाटावरच नाही,तर घाटाखालूनही आपल्याला मताधिक्य मिळणार आहे. दीड लाखापेक्षाही जास्त लीडने निवडून येणार आहे. विजय मिळावा म्हणून कुलदैवत वा कुठल्याही देवाला नवस केलेला नाही.कुठेही गेलेलो नाही. शहरातच आहे. 

बारणे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हे शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे पूत्र पार्थ असल्याने ही लढत लक्षवेधी झाली आहे. राज्याचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. आपल्या विजयाविषयी बारणे हे ठाम दिसले. ते विजयी झाले,तर ती त्यांची खासदारकीची दुसरी टर्म असेल. तर, शिवसेनेची ती हॅटट्रिक ठरेल. दरम्यान, पार्थ यांनी, मात्र २३ मे नंतर म्हणजे मतमोजणी झाल्यानंतरच बोलणार असल्याचे सांगितले.

Web Title : The elections will be won by one and a half lakh votes Shrirang Barne

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT