बातम्या

शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध; बेळगावमध्ये बायपास रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी पाडलं बंद

सकाळ न्यूज नेटवर्क

बेळगाव - शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात बुधवारी बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. पण हे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. शेती बचाव समितीच्या सदस्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे - बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते चार ए जोडण्यासाठी बायपास रस्त्याचा घाट घालण्यात आला आहे  मात्र या बायपास रस्त्यामुळे वडगाव, अनगोळ, शहापूर, हलगा शिवारासह इतर भागातील एक हजारहुन अधिक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन या रस्त्यात जाणार आहे. यासाठी या मार्गास शेतकऱ्यांचा विरोध आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु सोमवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पोलीस बंदोबस्तात काम सुरू केले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी  मजगांव शिवारात जाऊन काम बंद पाडले. तसेच रस्ता करण्यासाठी आणलेले जेसीबी, ट्रक व रोलरसह कर्मचाऱ्यांना तेथून पिटाळून लावले. यावेळी शेतकरी व कर्मचारी यांच्यात वादावादी झाली, मात्र शेतकऱ्यांनी पुन्हा काम सुरू केल्यास हिसका दाखविण्याचा इशारा दिला. 

Web Title: work of Bypass road in Belgaum was stopped by the farmers

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravindra Waikar News : मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकरांना उमेदवारी?

Mens Fashion Tips: मुलांनो पार्टीत सुदंर दिसायचय ? या टीप्स फॉलो करा

IPL 2024 Points Table: चेन्नईची टॉप ३ मध्ये धडक! हैदराबादसह या संघांचं टेन्शन वाढलं

Travel Tips: कुटुंबासोबत फिरायला जाताय? अशी घ्या काळजी

Narendra Modi : निवडणुकीत बहुमत संविधान बदलण्यासाठी हवंय का? काँग्रेसच्या आरोपांना PM मोदींकडून उत्तर, म्हणाले...

SCROLL FOR NEXT