बातम्या

VIDEO | सत्तास्थापनेवर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सत्तेच्या समीकरणांसंदर्भात कोण काय बोलते यावर मी बोलणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता असून, आम्ही पूर्णपणे आश्वस्त आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भाजप- शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. राज्यातील ओल्या दुष्काळासंदर्भात ही भेट होती. मुख्यमंत्र्यांनी बोलताना युतीचा उल्लेख टाळल्याचे स्पष्ट दिसले.

मुख्यमंत्री म्हणाले, की नवं सरकार राज्यात लवकरच स्थापन होईल. सत्तेच्या समीकरणांबाबत मी आणि भाजपचे नेते काहीच बोलणार नाही. ओल्या दुष्काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून अमित शहांची भेट घेतली. तात्काळ मदत मिळण्यासाठी त्यांनी निर्देश दिले आहेत. 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळावी म्हणून ते स्वतः लक्ष घालणार आहेत. विम्या कंपन्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. नुकसानीचा अहवाल मी त्यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

Web Title: CM Devendra Fadnavis talked about government formation in Maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

SCROLL FOR NEXT