शेतात गुडघाभर पाणी साचल्याने सोयाबीन पीक धोक्यात... गजानन भोयर
ऍग्रो वन

शेतात गुडघाभर पाणी साचल्याने सोयाबीन पीक धोक्यात...

कृषी विभागाने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी

गजानन भोयर

वाशिम - मागील दोन दिवसांत वाशिम Washim जिल्ह्यात झालेल्या अती पावसामुळे सोनखास गावासह जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान Damage झाले आहे. शेतात पाणी साचून असल्याने शेकडो एकर शेतीचं Farm नुकसान झाले आहे. दरम्यान सोयाबीन काढणीला आले असून, शेतात गुडघाभर पाणी असल्याने सोयाबीनची Soyabean काढणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिल्यामुळे आज जर पाऊस झाला तर पीक हातचं जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळं कृषी विभागाने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील शेतकरी यंदा सोयाबीनची पेरणी केली तेव्हापासून चांगली मशागत केल्यामुळे सोयाबीन पीक बहरात होते.मात्र दोन दिवस झालेल्या पावसामुळे सोयाबीन च्या शेतात गुडघा भर पाणी असल्याने पीक हातचं जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळं कृषी विभागाने नुकसान ग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण चार लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास तीन लाख हेक्टरवर सोयाबीनचे पीक घेतले जाते. मात्र यंदा ऐन सोयाबीन चा हंगाम जवळ आला असतांना पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

SCROLL FOR NEXT