खरीप  
ऍग्रो वन

दरवर्षी खरीप संकटात; पिके पेरावे तरी कोणते?

दरवर्षी खरीप संकटात; पिके पेरावे तरी कोणते?

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कपाशीवर बोंड आळी तर उडीद मूग व मका दरवर्षी अतिवृष्टीची नुकसान होत असल्यामुळे पिके पेरावी तरी कोणते? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खराब झालेला माल कमी दराने विकावा लागत असल्यामुळे त्याचप्रमाणे विमा कंपन्या विमा देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे दरवर्षी शेतकरी सुलतानी व अस्मानी संकटात सापडत असून शेती तोट्यात चालली आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

मागील तीन-चार वर्षापासून खरीपाची पिके कमी परतीच्या अवकाळी पावसामुळे तर कधीही मान्सूनच्या अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडला आहे कधीकाळी विदर्भात पांढरे सोने म्हणून असलेले कापसाचे बोंड अळीच्या प्रादुर्भावाने हद्दपार झाले आहे. यावर्षी सुद्धा मोठ्या क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. उडीद व मग पाठोपाठ मका खराब होत असून गतवर्षी सारखी स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पीकवाढीच्या काळात तीन आठवड्याची आता पीक काढणीस आल्यानंतर अतिवृष्टी मुळे हातातोंडाशी आलेले पिक खराब होत आहे. यावर्षी ही मागील वर्षीप्रमाणे उडीद मूग व मका संकटात सापडले आहे. मागील वर्षी कापसाचे आतोनात नुकसान झाले असले तरी विमा कंपनीने नुकसान भरपाई दिलीच नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवरील विश्वास उडाला परिणामी या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा कंपनी कडे पाठ फिरवली खराब झालेल्या शेतमालाला कमी भाव विमा कंपनीची टाळाटाळ शेतकरी दरवर्षी अस्मानी व सुलतानी संकटात सापडत आहे. त्यामुळे ती पेरावी तरी कोणती असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत.

संपूर्ण खरिपच आले धोक्यात

जिल्ह्यात ९५ टक्के जमिनीवर कापसाचा पेरा आहे. पाच टक्के असलेले उडीद मुगाचे पीक सततच्या पावसाने सडून गेले आहे.आता कापसावर आशा असताना पाऊस दररोज पडत असल्याने कापसाच्या झाडावरच कोंब फुटत आहे.शेतकऱ्याने करावे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT