बोली पद्धतीने आणले शेतकऱ्यांचे 'अच्छे दिन'; अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पद्धत
बोली पद्धतीने आणले शेतकऱ्यांचे 'अच्छे दिन'; अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पद्धत जयेश गावंडे
ऍग्रो वन

बोली पद्धतीने आणले शेतकऱ्यांचे 'अच्छे दिन'; अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पद्धत

अॅड. जयेश गावंडे

अकोला - अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोली पद्धतीने शेतकऱ्यांचा माल विकत घेण्याची पद्धत सुरू झाली आहे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. जागेवरच शेतकऱ्यांचा माल जात असून सोयाबीनला दरही चांगला मिळत आहे. सध्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली असल्याने, तेल उत्पादक कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा थेट माल बोली पद्धतीने विकला जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.

हे देखील पहा -

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल अडत्यांमार्फत विकला जात होता. परिणामी, शेतकऱ्यांना चांगल्या भावाची वाट पहावी लागत होती. जोपर्यंत चांगला भाव मिळत नव्हता तोपर्यंत शेतकरी त्यांचा माल मार्केटच्या आवारातच ठेवून देत होते. यामुळे बऱ्याच वेळा त्यांचा माल खराब होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, आता अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोली पद्धतीने शेतकऱ्यांचा भाव विकला जात आहे.

दरम्यान, या पद्धतीने सुरू झालेला हा माल खरेदीचा प्रकार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. दरम्यान सोयाबीनला सध्या सहा हजार रुपये हा उच्चांकी दर मिळत आहे. तर पुढील काही दिवसांत सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बोली पद्धतीमुळे शेतकऱ्यांसमोर मालाला किती भाव मिळतो, हे स्पष्ट होते. तसेच मालमध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटींची शक्यता राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा दर मिळण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे अडत्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबली आहे. परिणामी, आता शेतकरी स्वतः मालाच्या बोलीवेळी उभा राहून मालाची विक्रीची प्रक्रिया पाहत आहे, हे विशेष.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT