Latur News
Latur News Saam Tv
ऍग्रो वन

बाब्बो! लातुरात गोगलगायीचा नायनाट करण्यासाठी कोटींचा खर्च

दीपक क्षीरसागर

लातूर -चालू वर्षी शेतकऱ्यांना गोगलगायीच्या संकटाला सामोरे जावं लागलं आहे जिल्ह्यात किमान चार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन (Soybean) आणि अन्य पिकावर गोगलगायीचा हल्ला झाला असल्याने त्याचा बंदोस्तासाठी शेतकऱ्यांना (Farmer) किमान शंभर कोटी रुपयांचा खर्च झाला असल्याचा दावा लातूरचे (Latur) खत आणि औषधी विक्रेते रोहन काळे यांनी दावा केला आहे.

हे देखील पाहा -

लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादक जिल्हा अशी ओळख आहे साधारणपणे जिल्ह्यात सहा लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते तर दरवर्षी जवळपास साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी होत असते तर उर्वरित क्षेत्रावर अन्य पिकांची पेरणी केली जाते चालू वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

लातूर जिल्ह्यात चार लाख क्षेत्रावर गोगलगायीचा धोका निर्माण झाला आहे. कोवळ्या पिकाला गोगलगायी हल्ला करून कोवळी पाने कुरतडतात यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीच संकटाला तोंड द्यावं लागतं. यासाठी किमान शंभर कोटी रुपये खर्च आला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करावी लागली असली तरी अजूनही पूर्णपणे गोगलगायीचा नायनाट झाला नाही यामुळे हा खर्च दीडशे कोटी पर्यंत जाऊ शकतो असा दावा लातूरचे खत आणि औषधी विक्रेते रोहन काळे यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

Dr. Anjali Nimbalkar : डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचारातही निभावली ड्यूटी ; अपघातातील जखमीला उपचार करत स्वतः घातले टाके

SCROLL FOR NEXT