Buldhana News Farmer Saam tv
ऍग्रो वन

शेतात तुंबलेल्‍या पाण्यातच जलसमाधी आंदोलन; पंचनाम्‍यांना होतेय दिरंगाई

शेतात तुंबलेल्‍या पाण्यातच जलसमाधी आंदोलन; पंचनाम्‍यांना होतेय दिरंगाई

संजय जाधव

बुलढाणा : सलग चाललेल्‍या पावसामुळे शेताचे तळे झाले आहे. या पावसाने शेतातील पिके कुजून बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. तरी देखील अद्यापपर्यंत शासकिय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी (Buldhana) बांधावर पोहोचलेले नाही. यामुळे स्वाभिमानीने तुंबलेल्‍या पाण्यातच जलसमाधी आंदोलन केले. (Buldhana News Farmer Crop Damage)

गेल्या सहा दिवसात झालेल्या (Heavy Rain) अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. शेकडो शेतकाऱ्यांचे (Farmer) उभे पीक अतिपाण्यामुळे सडले आहे. पण अद्याप कुणीही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला नाही. शिवाय शेतकऱ्यांना नुकसान झाल्याची मदत जाहीर केली नाही.

जिल्ह्यात कुठेही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संग्रामपूर तालुक्यातील वानखेड शिवारातील शेतात शेकडो शेतकरी तुंबलेल्या चार फूट पाण्यात आंदोलनाला बसले आहेत. जोपर्यंत याठिकाणी जिल्ह्याचे किंवा मतदार संघाचे आमदार या ठिकाणी येत नाही; तोपर्यंत पाण्यातून हे शेतकरी उठणार नाहीत अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट,जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

Maharashtra Live News Update: श्रीरामपूरमध्ये हॉटेलवर छापा; घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर उघड, 10 सिलिंडर जप्त

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT