Buldhana News Farmer Saam tv
ऍग्रो वन

शेतात तुंबलेल्‍या पाण्यातच जलसमाधी आंदोलन; पंचनाम्‍यांना होतेय दिरंगाई

शेतात तुंबलेल्‍या पाण्यातच जलसमाधी आंदोलन; पंचनाम्‍यांना होतेय दिरंगाई

संजय जाधव

बुलढाणा : सलग चाललेल्‍या पावसामुळे शेताचे तळे झाले आहे. या पावसाने शेतातील पिके कुजून बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. तरी देखील अद्यापपर्यंत शासकिय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी (Buldhana) बांधावर पोहोचलेले नाही. यामुळे स्वाभिमानीने तुंबलेल्‍या पाण्यातच जलसमाधी आंदोलन केले. (Buldhana News Farmer Crop Damage)

गेल्या सहा दिवसात झालेल्या (Heavy Rain) अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. शेकडो शेतकाऱ्यांचे (Farmer) उभे पीक अतिपाण्यामुळे सडले आहे. पण अद्याप कुणीही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला नाही. शिवाय शेतकऱ्यांना नुकसान झाल्याची मदत जाहीर केली नाही.

जिल्ह्यात कुठेही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संग्रामपूर तालुक्यातील वानखेड शिवारातील शेतात शेकडो शेतकरी तुंबलेल्या चार फूट पाण्यात आंदोलनाला बसले आहेत. जोपर्यंत याठिकाणी जिल्ह्याचे किंवा मतदार संघाचे आमदार या ठिकाणी येत नाही; तोपर्यंत पाण्यातून हे शेतकरी उठणार नाहीत अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिकेसाठी आजपासून शिंदेंच्या शिवसेनेच्या मुलाखती

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले, प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा 22k अन् 24k गोल्डच्या आजच्या किंमती

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

SCROLL FOR NEXT