झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी शेतकऱ्यांसह "आमदारांची" औसा ते तुळजापूर पदयात्रा...  दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी शेतकऱ्यांसह "आमदारांची" औसा ते तुळजापूर पदयात्रा...

१६ ऑक्टोबर दिवशी औसा येथून पदयात्रेला सुरुवात

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. याकडे सरकार लक्ष देत नसून, शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याची संवेदनशीलता मुजोर विमा कंपन्यांवर कारवाई करण्याचे धैर्य आणि शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची सद्बुद्धी आघाडी सरकारला मिळावी, असे साकदे आई तुळजाभवानी देवीला आमदार अभिमन्यू पवार घालणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांसह लातुर जिल्ह्यातील औसा ते तुळजापूर पदयात्रा काढली जाणार आहे. या पदयात्रेला शनिवार १६ ऑक्टोबर दिवशी सकाळी ६ वाजता औसा येथून सुरुवात होणार आहे. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील १७ आॅक्टोबरला औसा आणि तुळजापूर मतदारसंघाच्या सीमेवरून पदयात्रेत सहभागी होणार आहेत. 

हे देखील पहा-

या अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असताना आशा भीषण परिस्थिती महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी वेळसुद्धा नाही. हजारो हेक्टरवरील जमिन खरडून गेलेला शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. तर अतिवृष्टीने खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असताना ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तातडीने भरीव निधी उपलब्ध ठाकरे सरकार करून देईल, असे अपेक्षित असताना या सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे.

असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. यामुळे ओला दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे असंवेदनशील आघाडी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि निद्रिस्त आघाडी सरकारला खडबडून जागं करण्यासाठी शेतकऱ्यांसह औसा ते तुळजापूर पदयात्रा काढली जाणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यायला अद्याप मुख्यमंत्री मराठवाड्यात आले नाही. कृषिमंत्री. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा होती ती देखील फोल ठरली आहे. 

एप्रिल २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तुटपुंजी भरपाई सरकारने ६ ऑक्टोबर दिवशी ६ महिने उशिरा जाहीर केली आहे. सरकारचा लातूर प्रती दुजाभाव इतका की त्यात लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १ रुपयाची सुद्धा मदत देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांप्रती आघाडी सरकार गंभीर नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील शेतकऱ्यांसह या पदयात्रेत सहभागी होणार आहोत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ऐश्वर्या राय मला लग्नाचा प्रस्ताव पाठवेल, मी तिचं मुस्लिम नाव..'; पाकिस्तानचा धर्मगुरू बरळला | VIDEO

Panvel-Karjat Railway: पनवेल- कर्जत प्रवास फक्त ३० मिनिटात, कधी सुरू होणार मार्ग, वाचा संपूर्ण A टू Z माहिती

Winter Health Care : हिवाळ्यात प्या हे ५ पौष्टिक आणि हेल्दी सूप

Maharashtra Live News Update : वाघोली–लोणीकंद परिसरात डंपरचे ओव्हरलोडिंग,दगड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला

Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार पूजेची मांडणी आणि कलश स्थापना कशी करावी?

SCROLL FOR NEXT