पावसामुळे शेती बरबाद, हवालदिल तरुणानं संपवलं जीवन   लक्ष्मण सोळुंके
ऍग्रो वन

पावसामुळे शेती बरबाद, हवालदिल तरुणानं संपवलं जीवन

तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना - महाराष्ट्रात Maharashtra मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. मराठा समुदायाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधवांनी राज्यभर मोठ्या संख्येनं आंदोलन केली होती. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षणही जाहीर करण्यात आलं होतं. पण अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्दबातल ठरवलं आहे. त्यामुळे अनेक मराठा तरुणांच्या पदरी निराशा आली आहे.

जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील आष्टी येथील येणोरा गावातील एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गावी ओलादुष्काळ असल्यानं शेतीचं नुकसान झालं आणि मराठा आरक्षण नसल्याने नोकरी मिळत अशा दुहेरी संकटात सापडलेल्या हवालदिल तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

हे देखील पहा -

सदाशिव शिवाजी भुंबर असं आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो परतूर तालुक्यातील आष्टी येथील येणोरा गावातील रहिवासी आहे. मृत सदाशिव हा मागील काही दिवसांपासून पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. त्यानं इलेक्ट्रीशनचा कोर्सही केला होता. मात्र मराठा समाजाला आरक्षण नसल्यानं त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी सदाशिव आपल्या गावाकडे येणोरा येथे आला होता.

त्याला घरी चार एकर शेती आहे. मात्र गावाकडेही सतत पाऊस असल्यानं त्याला ओला दुष्काळाचा सामना करावा लागला. पावसाच्या पाण्यामुळे शेतातील पिकंही करपून गेली होती. एकीकडे नोकरी सोडली आणि दुसरीकडे शेतीचं नुकसान झाल्यानं सदाशिव आर्थिक विवंचनेत सापडला होता. यामुळे हवालदिल झालेल्या सदाशिवनं आपल्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यानं आत्महत्येचा कारणांचा खुलासा केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT