उन्हाळी भुईमूग काढणी अंतिम टप्प्यात; भुईमुगाच्या दरात वाढ नाही
नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पावसाळी तसेच उन्हाळी दोन्ही हंगामात भुईमुगाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी अंतिम टप्प्यात असून तापमानाचा (Temperature) पारा 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. मात्र चक्रीवादळामुळे वातावरणातील बदल पाहता उन्हाळी मूग, भुईमूग तसेच इतर पिके काढणीला वेग आला आहे. (nandurbar news Summer groundnut harvest in final stage)
गेल्या दोन वर्षात शेंगदाणा तेलासह सोयाबीन व इतर खाद्य तेलाचे दर 180 ते 200 रुपये प्रति किलो झाले आहेत. तरी गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांनी (farmer) उत्पादित केलेल्या भुईमूग पिकाला केवळ दहा टक्केच दरवाढ झाली आहे. सध्या बाजारपेठेत उन्हाळी भुईमूगाला 60 ते 65 रुपये प्रति किलो दर आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी हा दर 45 ते 50 रुपये होता. खतांच्या किंमती शेतीसाठी लागणाऱ्या उत्पादनांचा खर्च मजुरी या सर्व बाबींचा विचार करता खर्चात मोठी वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या (Nandurbar News) मालाला दर कमीच आहे.
भुईमूगाला मात्र भाव नाही
गेल्या दोन वर्षात खाद्यतेलाच्या किंमतीत झालेली वाढ पाहता भुईमूग सोयाबीन या पिकांना देखील 30 ते 40 टक्के दर मिळणे अपेक्षित होते. मात्र कष्टकरी बळीराजाच्या पदरी निराशाच पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खाद्यतेलातील वाढलेल्या किंमती कोणामुळे व याचा फायदा कोणाला मिळतो याबाबत सरकारने संशोधन करणे गरजेचे आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.