
सागर निकवाडे
नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले असून रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फटका बसला आहे. यात दहा दिवसात दुसऱ्यांदा झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Tajya Batmya)
सोमवारी रात्री (Nandurbar) नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि शहादा तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने काढण्यासाठी आलेला हरभरा, गहू, रब्बी ज्वारी, टरबूज, खरबूज, केळी, पपई आणि मिरची पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. दरम्यान दहा दिवसांपुर्वी झालेल्या गारपीट व पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनाम अद्याप पुर्ण झालेले नसताना दुसऱ्यांदा संकट उभे राहिले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.