Nandurbar News: पहिल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले नसतानाच दुसऱ्यांदा संकट; नैसर्गिक संकटाने शेतकरी उध्वस्त

पहिल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले नसतानाच दुसऱ्यांदा संकट; नैसर्गिक संकटाने शेतकरी उध्वस्त
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले असून रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फटका बसला आहे. यात दहा दिवसात दुसऱ्यांदा झालेल्‍या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Tajya Batmya)

Nandurbar News
Dhule News: जिल्‍ह्यात रात्री रिमझिम पाऊस; नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्याचे प्रयत्‍न

सोमवारी रात्री (Nandurbar) नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि शहादा तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने काढण्यासाठी आलेला हरभरा, गहू, रब्बी ज्वारी, टरबूज, खरबूज, केळी, पपई आणि मिरची पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. दरम्‍यान दहा दिवसांपुर्वी झालेल्‍या गारपीट व पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनाम अद्याप पुर्ण झालेले नसताना दुसऱ्यांदा संकट उभे राहिले आहे.

लाल मिरचीचेही नुकसान

शेतकऱ्यांसोबतच नंदुरबारमधील मिरची व्यापाऱ्यांनाही आवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचे चित्र आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये खरेदी केलेली मिरची अवकाळी पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com