बुलढाणा - गेल्या चार, पाच वर्षांपासून सतत दुष्काळजन्य परिस्थिती आहे. सातत्याने जाणवणारी पाणी टंचाई, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर न पोहचणे आदी कारणांमुळे जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणारे पाळीव प्राण्यांचे गोठे आता दिवसेंदिवस कमी होत आहे. महागाई आणि चारा टंचाईमुळे काळजावर दगड ठेवून जिवापाड जपलेल्या गाई- गुरे- म्हशींची विक्री करण्याची वेळ बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पशुपालकांवर आली आहे.
हे देखील पाहा -
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गाई-म्हशी पाळल्या आहे. दुष्काळावर मात करीत अनेकांनी पशुपालन व दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. मात्र, जनावरांच्या खाद्यामध्ये होणाऱ्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला आहे. दुग्ध व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळतो, परंतु आता हा व्यवसाय देखील धोक्यात आला आहे. माणसांप्रमाणेच जनावरे आणि वन्य जीवांचीही होरपळ वाढली आहे. पाणी चाऱ्या अभावी पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
यंदा परिसरातील शेतकऱ्यांना दूबार हंगाम घेता न आल्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात चाऱ्याची आवक वाढली आहे. मात्र चाऱ्याच्या भाववाढीने पशुपालक मेटाकूटीला आले असून व्यापाऱ्यांची मात्र चांदी होत आहे. जिवापाड जपलेली गाई, गुरे, बैल, म्हशी चारा- पाण्याअभावी विक्रीस काढण्याची नामुष्की पशुपालकांवर आली आहे. संकटग्रस्त पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरु करुण द्याव्या अशी मागणी शेतकरी करीत आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.