असं वागाल तर..; कृषीमंत्र्यांचा व्यापारी, कारखानदारांना इशारा

- कृषिमंत्री दादाजी भुसे
- कृषिमंत्री दादाजी भुसेSaamtv

सातारा : शेतकऱ्यांची पिळवणूक करून शेतकऱ्याच्या मालाची काटेमरी करणाऱ्या आणि एफआरपी थकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे दिले आहेत. dada-bhuse-warns-traders-visits-farms-koregoan-satara-sml80

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे आज (रविवार) सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी सातारा, कोरेगाव तालुक्यात भेटी दिल्या. यावेळी म्हसवे येथील सचिन शेलार यांच्या गुलाबाच्या शेतीत सदिच्छा भेट दिली. शेलार यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या समस्या समजून घेतल्या. यानंतर कोरेगाव तालुक्यातील किन्हई येथील शेतकऱ्यांची सदिच्छा भेट घेत तेथे शेतक-यांशी संवाद साधला.

- कृषिमंत्री दादाजी भुसे
सलग २६ विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव; चक दे इंडिया!

प्रारंभी किन्हई येथे श्री. भुसे यांच्या हस्ते पिक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आमदार महेश शिंदे, शिवसेनेचे नेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, राहूल बर्गे तसेच शेतकरी उपस्थित होते.

यावेळी कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यापारी व कारखानदारांना इशारा दिला. ते म्हणाले राज्यातील शेतकरी कष्टाने आपले पीक पिकवतो मात्र व्यापारी काटेमारीतून त्याची फसवणूक करत आहे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी देखील कारखान्यांनी थकवली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक करून शेतकऱ्याच्या मालाची काटेमरी करणाऱ्या आणि एफआरपी थकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com