चक्क शिवसेना आमदारानेच दिला ठाकरे सरकारला इशारा  ( पहा व्हिडिओ )

Shivsena MLA Shahaji Bapu Patil Warns Maha Vikas Aghadi Government
Shivsena MLA Shahaji Bapu Patil Warns Maha Vikas Aghadi Government

पंढरपूर :  उजनी  Ujni धरणातील पाण्यावरून सोलापूरचे Solapur राजकारण चांगलेच तापू  लागले आहे. भाजप BJP आमदारांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच आता शिवसेनेचे Shivesena सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील  Shahaji Patil यांनी शरद पवारांवर Sharad Pawar  टीकास्त्र सोडत उजनीचे पाणी इंदापूरला नेले तर सोलापूर जिल्ह्यात रक्तरंजित आंदोलन केले जाईल असा थेट इशारा राज्यातील ठाकरे सरकारला दिला आहे. उजनीच्या पाण्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  Shiv Sena MLA  gave the warning to the Thackeray government

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी  इंदापूर Indapur तालुक्यातील 22 गावांसाठी योजनेस ठाकरे सरकारने मान्यता दिली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून Farmer तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्द्यावरून आज सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार यांच्यावर उजनीच्या पाण्यावरून जोरदार टीकास्त्र सोडत सरकारला घरचा आहेर दिला  आहे.

उजनीचे पाणी इंदापूरला  नेण्यास उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दिपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम सुरू केले आहे.  जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या दारासमोर आज पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी  

आज सांगोलाचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चिकमहुद येथील निवास स्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यास आपला  तीव्र विरोध असल्याचे सांगितले.  Shiv Sena MLA  gave the warning to the Thackeray government

यावेळी आमदार पाटील  म्हणाले की, उजनीचे पाणी इंदापूरला मंजूर करताना जिल्ह्यातील एका ही  आमदाराला विश्वासात घेतले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आघाडी सरकारने अन्याय केला आहे. अशा पद्धतीचा सरकारने निर्णय घेतला  तर आम्ही  रक्तरंजित लढाई करू असा इशारा आमदार पाटील यांनी  महाविकास आघाडीला सरकारला  दिला आहे.

राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केलेला आहे. राज्यातला सगळा निधी  बारामतीला वळवून न्यायचा  आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आहे असं सगळया  देशभर सांगत फिरायचं  ही पवारांची राजकीय  पद्धत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील , सुधाकरराव नाईक या नेत्यांनी नेहमी राज्याचा विकास पाहिला मात्र पवारांनी फक्त बारामतीचा विकास केल्याचा आरोप आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेला आहे.  Shiv Sena MLA  gave the warning to the Thackeray government

शरद पवार यांनी उजनी धरणातून  बारामती एमआयडीसी,  बारामती शहर आणि  सिनर्मास प्रकल्पना पाणी नेलं एवढं पाणी देऊनही जर शरद पवारांना पाणी कमी पडतय  असं वाटत आहे. उजनी धरणच पुणे जिल्ह्यात वळवण्याची काय यंत्रणा असती तर ते धरण सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेलं असतं अशी जोरदार टीका आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. यावरून आता येत्या काळात उजनी धरणाच्या पाण्यावरून पवार विरुद्ध सोलापूर जिल्हा असा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com