सर्वसामन्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. डाळी, कडधान्य, खाद्यतेल आणि कांदा बटाट्यांसह अनेक वस्तु जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळण्यात आल्यात. त्यामुळे या वस्तुंच्या उत्पादन, पुरवठा आणि दरांवर आता सरकारचं नियंत्रण नसेल. संसदेत आज जीवनावश्यक वस्तू सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलंय. या विधेयकामुळे कृषी सुधारणेसोबतच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असा दावा सरकारच्या वतीने करण्यात आलाय. शिवाय अन्नधान्य व्यवसायात खासगी गुंतवणूक वाढेल असाही सरकारचा अंदाज आहे. कोरोनाची परिस्थिती अधिकाधीक बिकट होत असताना आता, या वस्तुंना जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळण्यात आल्याने सामन्यांवर त्याचा कसा आणि काय परिणाम होईल, ते सांगता येत नाही.
या सुधारणा विधेयकात नेमक्या काय तरतुदी आहेत वाचा -
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.