टोमॅटो पिकाबद्दल एक अफवा पसरवली जातेय. ज्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात आलेत. नेमका काय आहे, हा सगळा प्रकार? या सविस्तर रिपोर्टच्या माध्यमातून समजून घेऊयात आणि शेतकऱ्याला या संकटातून वाचवू यात.
आधीच लोक कोरोनामुळे धास्तावलेत. एका व्हायरसनं इतके दिवस लोकांचं जगणं मुश्कील करुन सोडलंय.. अशात आता अफवा संकटांचा नवा डोंगर रचतायत. टोमॅटोवर असलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून अफवा
पसरवल्या जात आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय.
टोमॅटोवर जरी हा विषाणू असला तरी आपल्याला त्याचा धोका का नाहीये. हे समजून घेऊ.
अफवा थांबवा, बळीराजाला वाचवा
आधीच विषाणूजन्य आजाराने टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यातही जे पिक उरलंय. ते असल्या अफवांमुळे विकलं जाणार नाही. याची भीती शेतकऱ्यांना सतावतेय. याचं भान ठेवून तरी आपण सगळ्यांनी असल्या अफवांपासून चार हात लांब राहायला हवं. बळीराजाला वाचवायला हवं...
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.