धक्कादायक ! घरगुती वादाला कंटाळून आईनं ५ मुलींसह घेतली विहरीत उडी
राजस्थानच्या कोटमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घटना कोटा येथील रामगंजमंडी भागातील आहे. येथे शिवलाल पत्नी बादाम देवी आपल्या सात मुलींसोबत राहत होता. पतीसोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळून पत्नी बादाम देवी यांनी आपल्या पाच मुली सावित्री (वय 14 वर्षे), अंजली (8 वर्ष), काजल (वय 6 ), गुंजन (वय 4) आणि अर्चना (1 वर्ष) यांना घेऊन विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. रविवारी सकाळी ग्रामस्थांनी सर्वांचे मृतदेह विहरीतून बाहेर काढले. दोन मुली घराबाहेर असल्या कारणाने त्यांचा जीव वाचला असं म्हणता येईल. आता कुटुंबात फक्त गायत्री (14) आणि पूनम (7) जीवंत आहेत. या मुली घरात असत्या तर यांनाही आपला जीव गमवावा लागला असता.
पतीला विचारले असता त्याने घराबाहेर असल्याचे सांगितले. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण होत आहेत. पती-पत्नीमध्ये रोज भांडणे होत असल्याची चर्चा गावभर आहे. परस्पर वादामुळे महिलेने आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. रामगंज मंडीचे डेप्युटी एसपी प्रवीण नायक म्हणाले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सर्व 6 मृतदेहांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.