"संविधानाच्या माध्यमातून देश पुढे जातोय"- पंतप्रधानांचा विश्वास

संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले
"संविधानाच्या माध्यमातून देश पुढे जातोय"- पंतप्रधानांचा विश्वास
"संविधानाच्या माध्यमातून देश पुढे जातोय"- पंतप्रधानांचा विश्वास Saam Tv

वृत्तसंस्था : संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आहे. तसेच २००८ मध्ये मुंबई करण्यात आलेला २६/11 च्या हल्ल्यामधील शहीदांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, आपले संविधान हे देशाच्या हजारो वर्षांच्या भारताच्या महान परंपरेची अधुनिक अभिव्यक्ती आहे. संविधानाविषयी समर्पण आहे.

जेव्हा आपण या संविधानिक व्यवस्थेच्या माध्यमामधून लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी सांभाळत असतो. त्यासाठी नेहमीच स्वत:ला सिद्ध ठेवावे लागणार आहे. हे करताना संविधानाच्या मूल्यांना ठेच लागणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. आपण जे काही करत आहे. ते संविधानानुसार योग्य की चुकीचे हे पाहावयास हवे. आपल्याला स्वत:चे मूल्यांकन करायला हवे असेही यावेळी मोदी म्हणाले आहेत. मोदी म्हणाले की, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची सुरुवात झाल्यावर आपण २६ नोव्हेंबर हा संविधान दिनाची परंपरा सुरु करायला हवी होती.

हे देखील पहा-

आपल्याला संविधान काय देते, कुठे नेते याची प्रत्येकवर्षी चर्चा झाली, तर संविधान ज्याला जगात एक सामाजिक दस्ताऐवज मानला गेला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मोठी भेट दिली याची आपण दरवर्षी आठवण म्हणून हा दिन साजरा करत आहोत. काँग्रेस बरोबरच इतर विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधावर मोदींनी चांगलाच निशाणा साधला आहे. विरोध सुरुवातीपासूनच होत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर आणि तुमच्या मनात तयार होत असलेला भाव ऐकण्याकरिता ते तयार नाही.

मन मोठे करून, बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिले त्याचे स्मरण न करणे हे चिंताजनक असल्याचे मोदी म्हणाले आहेत. भारत ही लोकशाहीची परंपरा आहे. राजकारणाचे एक महत्त्व आहे. राजकीय पक्ष त्यांचे लोकशाही मूल्य गमावत राहतील तर ते लोकशाही कसे जपू शकतात असा सवाल देखील मोदींनी विचारला आहे. भ्रष्टाचारावरून मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्याची जी स्पर्धा चाली आहे.

"संविधानाच्या माध्यमातून देश पुढे जातोय"- पंतप्रधानांचा विश्वास
जगासाठी धोक्याची घंटा! दक्षिण आफ्रिकेत आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट

यामुळे नव्याने येणाऱ्या लोकांना चुकीचा आदर्श घालून दिला जात आहे, असेही मोदी म्हणाले आहेत. इंग्रज भारताचे अधिकार नाकारत होते. महात्मा गांधींनी अधिकाराकरिता लढताना देशात कर्तव्यासाठी नागरिकांना तयार करण्यात आले होते. त्याकरिता सतत प्रयत्न केले आहे. मात्र, स्वातंंत्र्यानंतर महात्मा गांधींनी कर्त्यव्याची बीजे रोवली आहेत, आणि त्यादिशेने दुर्दैवाने तत्कालीन सरकारने काम केले नाही.

तेव्हाच्या सरकारने अधिकार असे म्हणत सगळं हातात घेतले आहे. स्वातंत्र्यानंतर कर्तव्यावर भर दिला असता, तर अधिकारांचे संरक्षण झाले असते असे म्हणत परत एकदा मोदींनी अप्रत्यक्षपणे नेहरुंवर आणि काँग्रेसवर टीका यावेळी करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com