लखनौ :उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) नूकतेच लग्न झालेल्या दम्पत्यामध्ये वादाची घटना समोर आली आहे. या नव दाम्पत्यामध्ये मागिल चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. पुढं या दोघांनी लग्न (Marriage) करण्याचा निर्णय घेतला. या लग्नासाठी दोघांचेही कुटुंब तयार नव्हते. पण दोघांच्या प्रेमापुढे घरच्यांनी हार मानली आणि दोघांचे लग्न करुन दिले. पण पहिल्याच दिवशी या दाम्पत्यामध्ये मोठा वाद झाला. यामुळे दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.
पहिल्याच दिवशी नवरीने नवऱ्याला शारीरिक संबंध ठेवायला अजिबात आवडत नाही, असं सांगितलं. सुरुवातीला, वराला वाटले की कदाचित ती विनोद करत आहे. पण वधूने ही गोष्ट स्पष्ट सांगितली. हे ऐकून वराच्या पायाखालची जमीनच सरकली. घरच्यांनी मुलीला खूप समजावलं, पण ती मान्य झाली नाही आणि शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत राहिली. यामुळे दोघांमध्ये वाद वाढत गेले.
हे देखील पाहा
प्रेमविवाहानंतर (Love Marriage) वधूचा शारीरिक संबंध न ठेवण्याच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. हा प्रश्न पंचायतीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला पण वधू आपल्या निर्णयावर ठाम राहिली. यानंतर सासरच्यांनी लोकांनी वधूला समुपदेशनासाठी घेवून गेले. तिथे तिचे समुपदेशन करण्यात आले, पण तिने शारीरिक संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर दाघांनीही घटस्पोय घेण्याचा निर्णय घेतला.
याबाबत नारी उत्थान केंद्राच्या समुपदेशक रितू नारंग म्हणाल्या, हे एक प्रेमप्रकरण होतं ज्यामध्ये मुलगी आणि मुलामध्ये गेल्या ४ वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. जर त्याने तिच्याशी लग्न नाही केले तर आत्महत्या करण्याची धमकी मुलीने मुलाला दिली होती. यानंतर मुलाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलीचे वय २३ वर्षे आहे. लग्नानंतर तीनच महिन्यात या दोघांनी वेगळ राहण्याचा निर्णय घेतला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.