आमदारांची नाराजी नको म्हणून राज्यातील प्रशासकीय बदल्यांना राजकीय ब्रेक

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांदरम्यान, सरकारला आमदारांची नाराजी ओढवून घ्यायची नाही.
MVA Goverment
MVA GovermentSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील प्रशासकीय बदल्यांबाबत काढलेला निर्णय मागे घेतला आहे. या प्रशासकीय बदल्या आता ३० जूनपर्यंत स्थगित केल्या आहेत. राज्यातील प्रशासकीय बदल्या मे महिन्यात करा, असा आदेश सरकारने मागील आठवड्यात काढला होता. पण, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या एक महिना पुढे ढकलण्याचा राजकीय निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

हे देखील पाहा -

सरकारला राज्यातील आमदारांची नाराजी ओढावून घ्यायची नसल्यामुळे या बदल्या पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जात आहे. कारण, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या असून, या दोन्ही निवडणुकांमध्ये आमदारांच्या मतांना महत्व असतं शिवाय आमदारांना आपआपल्या मतदार संघात, जिल्ह्यांमध्ये अपेक्षित बदल्या हव्या असतात, त्यासाठी त्यांनी निवेदनं देखील दिलेली असतात. मात्र, या बदल्यांमध्ये सरसकट सर्वांना खुश करणे शक्य नसल्यामुळे सरकारने सावध भूमीका घेत हा धोरणात्मक निर्णय घेत या बदल्या आता ३० जून पर्यंत करु नये असा निर्णय घेतला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com