Uddhav Thackeray News : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्याचे निमित्ताने मोदी सरकारकडून वेगवेगळे उपक्रम, मोहिमा राबविल्या जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी घरोघरी तिरंगा अभियनाची घोषणा केली. या अभियानावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदी सरकारने घरोघरी तिरंगा कार्यक्रम दिला आहे. पण ज्यांच्याकडे घरच नाही. ते लोक तिरंगा कुठे लावणार ? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
साप्ताहिक 'मार्मिक' च्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, 'शिवसेना सकाळी पडलेलं स्वप्न नाही. मार्मिक साप्ताहिकने शिवसेनेची बीज पेरली. त्यानंतर मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला. महाराष्ट्राला मुंबई मिळाली तरी मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा मार्मिकने फोडली. मार्मिकने अस्वस्थ मनाला वाचा फोडली'.
'भारत मातेच्या गळाला फास आहे. तो आजही तसाच आहे. नुसता तिरंगा फडकवला म्हणजे देशभक्त झालो असं होत नाही. केंद्र सरकारने घरोघरी तिरंगा कार्यक्रम दिला आहे, पण लोकांकडे घराचा पत्ता नाही. म्हणजे ज्यांच्याकडे घरच नाही. ते तिरंगा कुठे लावणार, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.