डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील १८ गावांना महापालिकेकडून मुलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. मात्र कर वसुली केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत आज मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्यापासून या गावांमध्ये सुविधा नाही तर कर नाही. हे आंदोलन सुरू करण्यात असल्याचा इशारा दिला. १८ गावांध्ये सुविधा नाही तर नाही या आशयाचे बॅनर लावून आपण स्वतः नागरिकांना कर न भरण्याचे आवाहन करणार असल्याचं आमदार राजू पाटील यांनी सांगितलं. (MNS Raju Patil Latest News)
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या गावामध्ये मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. याबाबत अनेकदा पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर हे पालिका प्रशासनाने काहीच कार्यवाही न केल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.
या गावांवर अन्याय होतो, पालिकेने या गावांकडे दुर्लक्ष केलं, कोरोना काळात या गावांना कोणतीही सुविधा देण्यात आली नाही. मूलभूत सुविधा कडे दुर्लक्ष केलं जातंय, मात्र पालिकेची कर वसुली सुरू आहे . गावांना सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. रस्त्यांची दुरवस्था व पाणी टंचाई यामुळे नागरीक त्रस्त आहे .या पार्शवभूमीवर सुविधा नाही तर कर नाही हे आंदोलन घेण्यात येणार असून याबाबत मी स्वतः नागरिकांना कर न भरण्याबाबत आवाहन करणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.