मास्क सक्तीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं ? आरोग्य मंत्र्यांनी दिली अपडेट

Rajesh Tope
Rajesh TopeSaam Tv

मुंबई - राज्यात पुन्हा मास्क (Mask) सक्ती होणार की नाही याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील कोरोना रूग्ण संख्येवर (corona patients) लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगत सध्या राज्यात मास्क सक्ती करणार नसल्याचे टोपेंनी स्पष्ट केले आहे. मात्र राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढणार नाही याबाबत योग्य खबरदारी घेण्यात येईल असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला अशी माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Rajesh Tope
बुद्धी तल्लख करण्याच्या नावाखाली तांत्रिकाने केला तरुणीवर बलात्कार

टोपे यांनी सांगितले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत संपूर्ण कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दर आठवड्याला घेतो तसा. राज्यात थोडीशी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. ०. ३ पासून ०.७ इतका कोरोना रुग्णांचा रेट वाढला आहे. त्याची एक नोंद घेण्यात आली. त्यात घाबरण्याची आवश्यता नाही. परंतु मास्क घालावा असं आवाहन करण्यात आलं. पण मास्क वापरणं बंधनकारक नाही. दंड आकारला जाणार नाही. कोरोना संख्येवर लक्ष राहील, मात्र मास्क घालावं असं आवाहन राहील असं पुढे राजेश टोपे म्हणाले.

कोरोना (Corona) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल देशातील मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला या संवादानेतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना मास्कबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या परिस्थिती चांगली आहे, कोरोनाचे रुग्ण वाढत नाहीत. मात्र, आपण टेस्टिंग वाढवणार आहोत. सहा ते बारा वयोगटातील मुलांचे लसीकरण करणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com