आता 'ही' मागणी मान्य व्हावी : अजित पवार; 'हुकूमशाह' झुकले : पाटील

आज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कृषी कायदाबाबत माेठी घाेषणा केल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत
ajit pawar jayant patil
ajit pawar jayant patil

मुंबई : शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले. झालेली चूक सुधारत केंद्र सरकारने शेतकरीविरोधी असलेले कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज सकाळी केली. लोकशाहीच्या समोर आज अखेर हुकूमशाही झुकली अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी (narendra modi) यांनी तीन कृषी कायदा मागे Farm Laws To Be Repeal घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनीही पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकामुळेच हा निर्णय घेतल्याचे नमूद केले.

ajit pawar jayant patil
DCC त उदयनराजे सुटले; सहकारमंत्र्यांपुढे उंडाळकरांचे आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. योग्य निर्णया घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींचे आभार मानले. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे देखील पवार यांनी अभिनंदन केले. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे असे ही पवार यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन काळे कायदे करून या देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजपा सरकारचा डाव होता. देशातील शेतकऱ्यांनी या विरोधात प्राणपणाने लढा दिला आणि त्यामुळेच आज अखेर देशातील या हुकूमशाही सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले असे म्हटलं. शेतकऱ्यांच्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या बाजूने लढत होता असे त्यांनी नमूद केले.

जवळपास ६३० शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यानंतर सरकारने हे कायदे परत घेतले आहेत. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी हा निर्णय घेतला असला तरी या काळ्या कायद्यांमधील तरतुदी वेगवेगळ्या मार्गांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न पुन्हा केंद्र सरकारने करू नये असा सल्लाही पाटील यांनी दिला आहे.

ऐतिहासिक लढाईचे यश : सतेज पाटील

काॅंग्रेसचे आमदार काेल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी तिन्ही काळे कृषी कायदे मागे घेणे हे शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढाईचे यश आहे असे म्हटलं. आगामी निवडणुकामधील फायद्यासाठीच हा निर्णय घेतला आहे हे स्पष्ट असले तरी या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला, याला जबाबदार कोण? असा प्रश्न ट्विट करुन त्यांनी विचारला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com