Exclusive मुलाखत: कुठे होते अमोल कोल्हे; ब्रेकची गरज का?, पुढे निवडणूक लढणार?

एकांतवासात गेल्यानंतर पहिल्यांदाच अमोल कोल्हे माध्यमांसमोर आले होते. त्यांनी साम टीव्हीला सविस्तर मुलाखत दिली आहे.
Exclusive मुलाखत: कुठे होते अमोल कोल्हे; ब्रेकची गरज का?, पुढे निवडणूक लढणार?
Exclusive मुलाखत: कुठे होते अमोल कोल्हे; ब्रेकची गरज का?, पुढे निवडणूक लढणार?Saam TV

प्राची कुलकर्णी

पुणे: एकांतवासात गेल्यानंतर पहिल्यांदाच अमोल कोल्हे माध्यमांसमोर आले होते. त्यांनी साम टीव्हीला सविस्तर मुलाखत दिली आहे. त्यात बोलताना त्यांनी अनेक राजकीय अराजकीय प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना कोल्हे म्हणाले ''एसटी आंदोलनाविषयी माहिती नाही, पण कोणतेही पक्षीय राजकारण न आणता हे कष्टकऱ्यांचं आंदोलन आहे तर तोडगा काढणे गरजेचं आहे''.

पोलरायझेशन च्या बाबतीत अमोल कोल्हेंनी चिंता व्यक्त केली आहे. विराट कोहलीच्या मुलीला आलेल्या धमकीवर देखील त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशात सध्या सुरु असलेल्या सुरक्षा एजन्सीवरील राजकारणावर अमोल कोल्हे यांनी प्रश्न उपस्थीत केला व ते म्हणाले सुरक्षा एजन्सीवर विश्वास ठेवायचा का हा सर्वसामान्य लोकांना प्रश्न आहे. देशात पोलरायझेशन वाढायला लागलंय का? का वाढतंय? अल्प कालीन पोलरायझेशन करुन सत्ता मिळवण्यासाठी दिर्घकालीन विषवल्ली रोवतोय का? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थीत केला आहे.

त्रिपुरा घटनेवरुन राज्यात उफाळलेल्या हिंसाचारावर अमोल कोल्हे म्हणाले ''हिंसाचार चिंताजनक आहे. गुण्यागोविंदाने नांदणारे एकमेकांची डोकी फोडत आहेत. तरुणांच्या हातात दगड कसे दिले जातात, हे जे कोण करत असेल त्याला माफ केलं जाणार नाही''. कंगना रानावतने केलेल्या विधानावर देखील अमोल कोल्हेंनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले ''कोणाची विधानं येतात समोर? एका अभिनेत्रीने केलेले विधान हा हौतात्मयाचा अपमान आहे. हे विधान कोणत्या मानसिकतेतून आले हे पाहणं महत्त्वाचं आहे. हे देश म्हणून घातक आहे, याला विरोध केला तर देशद्रोही ठरवुन मोकळं व्हायचं. विधायक विरोध संपत चाललं आहे''.

Exclusive मुलाखत: कुठे होते अमोल कोल्हे; ब्रेकची गरज का?, पुढे निवडणूक लढणार?
परळीची जनता हुशार; कोणाला किती उडू द्यायचं हे त्यांना कळतं- पंकजा मुंडे

पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा गांधींविषयी बोलतात त्यावर बोळा फिरवणारी विधानं कलुषित करतायत का? असा प्रश्न यावेळी अमोल कोल्हेंनी विचारला आहे. सेलिब्रेटींना सॉफ्ट टार्गेट केलं जातं त्याचप्रमाणे राजकारणी ही सॉफ्ट टार्गेट असतात. अमोल कोल्हेंनी शिरुर मतदार संघातून खासदार आहेत. अडीच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पुर्ण केला आहे. पुन्हा निवडणूक लढवणार का विचारले असता ते म्हणाले पाच वर्षांनी पुन्हा सिंहावलोकन करु. निवडणूक लढायची का नाही याबाबत पुन्हा विचार करु. पद हे एक साधन आहे साध्य नाही असेही कोल्हे म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com