- अमर घटारे
Amravati News : अमरावती जिल्ह्यात 22 गावांना एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या ठिकाणी प्रशासनाने विविध पद्धतीने पाणी पुरवठा सुरू आहे. मेळघाटातील (melghat) धारणी (dharni) व चिखलदरा (chikhaldara) हा आदिवासी बहुल अतिशय दुर्गम भाग समजला जातो. या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. (Maharashtra News)
मेळघाटातील (melghat) खडीमल गावातील लोकांना गेल्या एक वर्षा पासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील जिल्हा परिषदेची पाणीपुरवठा योजना याठिकाणी कुचकामी ठरलेली आहे.
अनेक गावांमध्ये अजूनही पाईपलाईन केली गेली नाही. तर त्या गावातील विहिरी आटल्यामुळे गावापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने गावातील महिलांना पुरुषांना 2-3 किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी पाणी आणावे लागते आहे.
मागील वर्षी संपूर्ण प्रशासन, आमदार, खासदार ,मंत्री याच गावात तळ ठोकून होते. मात्र अजूनपर्यंत या गावातील पाणी प्रश्नावर तोडगा काही निघालेला नाही.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.