खातेवाटपानंतर शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं आहे.
Uday Samant / Eknath Shinde
Uday Samant / Eknath ShindeSaam TV

रत्नागिरी: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जाहीर केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. आज खातेवाटप झाल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याकडे उद्योग खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना 'महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात क्रमांक एकवर आणणार असल्याचा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, 'उद्योग खात्यासारखं महत्वपुर्ण खातं मला दिल्याबद्दल सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मनापासून धन्यवाद देतो.

पाहा व्हिडीओ -

राज्यातील बेराजगारी मोठा प्रश्न असून जास्तीत जास्त प्रकल्प राज्यात आणुन ती दूर करण्याचा प्रयत्न करणार. तसंच महाराष्ट्र उद्योगिक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणणार असून कोकणातील रिफायनरीबाबत असणारे गैरसमज दूर करायला हवेत.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगारी संपविण्याचा प्रयत्न करणार असून बेराजगारी दूर करणारा प्रत्येक प्रकल्प राज्यात आणणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. तर येत्या सहा महिन्यात एखादा तरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com