जालना: जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळातील सोयाबीन पिकांचा अग्रीम विमा नामंजूर करण्यात आल्याच्या निषेदार्थ व महावितरण कंपनीच्या सक्तीच्या वीज बिल वसुलीच्या धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गावपातळीवर पारावर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.अंबड तालुक्यातील वडीगोद्री अंतरवाली सराटी, रेनापुरी, चंदनापुरी, पिठोरी सिरसगाव, सौंदलगाव खुर्द,पाथरवालाखुर्द, नालेवाडी, घुंगर्डे हादगाव, करंजळा, जालुरा या गावात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी प्रभातफेरी काढून चावडीवर धरणे आंदोलनास सुरवात केली आहे. या वेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी "विमा आमच्या हक्काचा,नाही कुणाच्या बापाचा,"कोण म्हणतो देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही, रिलायन्स विमा कंपनीचा निषेध असो" आशा जोरदार घोषनाबाजी करत, सरकरच्या धोरणाचा जाहीर निषेध व्यक्त करत जिल्ह्यात सरासरीपेक्षा दीड पट पाऊस झाला आहे.
पिक विमा कंपनीने अतिवृष्टीला स्थानिक आपत्ती समजून शेतकऱ्यांना सरसकट विमा संरक्षित रक्कम द्यावी. जळीत रोहित्रे तात्काळ बदलून द्यावेत. सक्तीची बीज बिल वसुली तात्काळ थांबवावी. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली ५० हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान तातडीने द्यावे. अशा मागण्या ही यावेळी करण्यात आल्या. अन्यथा सरकारं विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरले असा इशारा ही यावेळी देण्यात आला.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.