सांगली : ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या तीन तरुणींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरज तालुक्यातील टाकळी याठिकाणी पारधी समाजातल्या दोन तरुणींसह एक बालिकेचा या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यातील टाकळीतील मलेवाडी ओढ्यात दोन पारधी समाजातील तरुणी व एक बालिका ओढ्यात अंघोळीला गेल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे.
हे देखील पहा :
टाकळी येथील जुना मालगाव रस्त्यावरील मलेवाडी ओढ्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. नंदिनी देवा काळे (वय 16), मेघा चव्हाण काळे (वय 18) आणि स्वप्नाली टवळ्या पवार (वय 6) अशी तिघींची नावे आहेत. हे सर्व जण टाकळी येथील आंबेडकर नगर मधील पारधी वस्ती या ठिकाणी राहतात. दुपारच्या सुमारास तिघी अंघोळीला गेल्या होत्या. त्या परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला.
शोध सुरू असताना ओढ्याच्या काठावर तिघींची चप्पल, कपडे पडल्याचे दिसून आल्याने त्या पाण्यात बुडल्याची शंका आली. सदर घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना देतात घटनास्थळी पोलिसांनी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर तिघींचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर घटनास्थळी पारधी समाजाच्या महिलांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला. तर ऐन दिवाळीत पाडव्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.