नंदुरबार : शरद पवार हे जाणते नेते असुन, साडे तीन जिल्हा आणि साडे तीन खासदारांच्या त्यांच्या पक्षाला नेहमीच पंतप्रधान पदाची (Prime Minister's post) स्वप्नं पडतात अशी घणाघाती टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत Sadabhau Khaot यांनी कली आहे. ते आज नंदुरबार Nandurbar जिल्हाच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी वरिल वक्तव्यं केलं.
हे देखील पहा -
सदाभाऊ खोत म्हणाले 'राष्ट्रवादी NCP ज्या पद्धतीने आर्यन खानच्या Aryan Khan मुद्यावर त्याची बाजु घेत आहेत. यावरुन राष्ट्रवादीचा डोळा एकाच जातीच्या मतांवर असून त्यांच्या सोयीसाठीची ते भूमिका घेत आहेत. मुळातच शरद पवार आणि नवाब मलिकांनी Nawab Malik हर्बल गांज्याचा Herbal Ganja शोध लावला असुन यातुन त्यांच्या जावयाप्रमाणे शेतकरी देखील सधन होतील म्हणुनच ते लागवडीच्या परवानगीची पत्र त्यांना दिल्याचे खोत यांनी सांगितले. तसेच हे सरकार गांजाडी असुन यातील मंडळी हे गांजा Drugs फुकुन कारभार करत असल्यानेच त्यांच्या कडुन असे वारंवार बोलले जात असल्याचे देखील खोत म्हणाले.
दरम्यान राज्य शासनाने State Goverment शेतकऱ्यांना Farmers वाऱ्यावर सोडलं आहे. दहा हजार कोटींचे जाहीर केलेल पॅकेज Package फसवे असून यामधील फक्त साडे तीनशे कोटीच शेतकऱ्यांपर्यत पोहचणार असल्याचा आरोप खोत यांनी राज्य सरकारवरती केला. "FRP प्रमाणे ऊसदर देत नसलेल्या साखर कारखान्यांवर त्वरीत कारवाईची मागणी त्यांनी केली. तर एका बाजुला सरकार मधुन बाहेर पडायचे नाही. आणि दुसऱ्या बाजुला शेतकऱ्यांचा पुळका असल्याचे दाखवायचे ही मगरीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचे प्रकार काही संघटना करत असल्याची टीका राजु शेट्टी Raju Shetty यांचे नाव न घेता खोत यांनी केली.
Edited by - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.