काेल्हापूर : ओमायक्राॅन omicron variant हा काेविड १९ च्या नवा प्रकार घातक असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या काेल्हापूरात काेविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिक बेफिकीर झाले आहेत. मास्क लावणेही टाळत आहेत. त्यामुळे मास्क न लावणा-यांवर काेल्हापूर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने आज (मंगळवार) महापालिका कर्मचा-यांकडून विना मास्क फिरणा-यांवर कारवाई केली जात आहे. मास्क घातलेल्या परंतु ताे व्यवस्थित नसल्यास त्यांच्यावर देखील कारवाई केली जात आहे.
मुख्य बसस्थानक, महाविद्यालय परिसर, प्रमुख चाैकांत महापालिकेने स्थापित केलेल्या पथकाच्या माध्यमातून मास्क नसलेल्यांना उठाबशा काढण्यास सांगतिले जात आहे. ही कारवाई सुरु असताना लांबून पाहणारे नागरिक पथकास चुकविण्याचा प्रयत्न करतात. युवा वर्गाची कारवाईची भीतीने पळापळ करताना दिसत आहे. काही ठिकाणी नागरिकांकडून ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई करताना महापालिकेचे कर्मचारी नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन देखील करीत आहेत.
शाळांच्या निर्णयात बदल नाही
दरम्यान राज्य शासनाने एक डिसेंबर २०२१ पासून शाळा सुरु करण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे उद्यापासून (बुधवार) काेल्हापूर जिल्ह्यातील शाळा सुरू होतील. जोपर्यंत पुढील निर्णय येत नाही तोपर्यंत यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले.
अन्य राज्यातून किंवा जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण करणे बंधनकारक आहे. लस घेतली नसेल तर ७२ तासाच्या आतील आर.टी. पी.सी आर चाचणी अत्यावश्यक असल्याचे राहूल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.